Homeपब्लिक फिगरघोटाळे करण्यात ज्यांची...

घोटाळे करण्यात ज्यांची हयात गेली त्यांना त्रास होणारच!

ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना काँक्रीटचे रस्ते होत आहेत याचा त्रास होणारच. कारण त्यामुळे ४० वर्षे रस्तेच बनवता येणार नाहीत. दरवर्षी डांबरी रस्ते बनवायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा हे आता बंद होणार आहे. त्यांची दुकानदारी बंद करण्याचे हे काम असल्यामुळे यांची ओरड चालली आहे. जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पलटवार केला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांचे नाव न घेता फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला. २०१८ साली सुमारे २०० रस्त्यांची चौकशी झाली होती. या चौकशीत या रस्त्यांना खालचा लेयरच टाकण्यात आला नव्हता असे आढळून आले. आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने यांची दुकानदारी बंद होणार आहे. इनका गोरखधंदा बंद होगा, यही उनका दर्द है… अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावले.

मी मुख्यमंत्री असताना एसटीपी योजनांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून आणल्या होत्या. परंतु टक्केवारी ठरली नाही म्हणून हे टेंडर काढू शकले नाहीत. आता आमचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई महापालिकेने याच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे या कामाचे क्रेडिट घेण्याचा यांना हक्कच नाही, असे ते म्हणाले. १५ वर्षे ज्यांना ते करता आले नाही ते एसटीपी प्रोजेक्ट आमच्या काळात झाले असे कसे म्हणू शकतात? तसे म्हणण्याचा यांना अधिकारच काय, असा सवालच फडणवीस यांनी केला. यांच्या काळात हाती घेण्यात आलेला ब्रीमस्टोवॅड प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे इतर प्रकल्पांवर हे काय बोलणार, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झोपेत बोलणारे हे लोक आहेत. मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. आणि आता त्याचे उद्घाटनही तेच करणार आहेत. त्यामुळे आमच्या काळात झालेल्या योजनांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत, या बोलण्यात काही तथ्य नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा मुंबईचा दौरा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला होईल. अपेक्षेपेक्षा जास्त मोठा जनसागर येथे उसळेल. त्यामुळे सर्व व्यवस्थेची खात्री करून घेण्यासाठी आम्ही आज आढावा घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content