९ आणि १३ ऑक्टोबरला गोरेगाव-कांदिवली परिसरात पाणी नाही!

मुंबईतल्या मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा बदलण्याच्या कामासाठी सोमवार, दिनांक ९ आणि शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा जुन्या व खराब झाल्यामुळे (एकूण १० जलद्वार) बदलण्‍याचे काम प्रस्‍तावित असून संपूर्ण काम दोन टप्‍प्‍यात पूर्ण करण्‍यात येईल. त्यापैकी पहिल्‍या टप्‍प्‍यातील कामात ९०० मिलीमीटर व्यासाचे तीन व ७५० मिलीमीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०४ जलद्वार (वॉल्‍व) सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्‍यात येणार आहेत. दुसऱ्या टप्‍प्‍यात ९०० मिलीमीटर व्यासाचे ०२ व ७५० मिलीमीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०३ जलद्वार शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्‍यात येतील.

त्यामुळे सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी व शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पूर्व), ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव (पूर्व) आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरांमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहील.

पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा सविस्तर तपशील:-

१) ‘पी उत्तर’– मालाड (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

२) ‘पी दक्षिण’– गोरेगाव (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

३) ‘आर दक्षिण’– कांदिवली (पूर्व) येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा – १ व २, नर्सीपाडा  परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content