Homeटॉप स्टोरीउद्यापासून अवकाळी पावसाचा...

उद्यापासून अवकाळी पावसाचा जोर ओसरणार!

आयएमडी च्या पुणे आणि नागपूर विभागाने स्वतंत्रपणे वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापासून पुढच्या पाच दिवसांत अवकाळी पावसाचा जोर ओसरणार आहे. पुढील 5 दिवसांचा (4 एप्रिल – 8 एप्रिल) अंदाज पुढीलप्रमाणेः

4 एप्रिल: पावसाचा जोर हळूहळू ओसरण्यास सुरुवात होईल, मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पाऊस सुरूच राहील.

5 आणि 6 एप्रिल: विदर्भात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे व्हायला सुरुवात होईल.

7 आणि 8 एप्रिल: राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तापमानात पुन्हा 2-3 अंशांनी वाढ होऊ शकते.

हवामान इशारा: महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना पावसाचा तडाखा; ‘गारपिटी’सह वादळी वाऱ्याचे अनुमान

आज 3 एप्रिलला महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा कायम आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या हवामानात मोठे बदल झाले असून, एकूण 20 जिल्ह्यांवर पावसाचे सावट आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा (हेलस्ट्रॉम) अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अवकाळी

जिल्हानिहाय अलर्ट आणि स्थिती

ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येथे ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहून काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येलो अलर्ट (Yellow Alert)

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

मुंबई आणि कोकण किनारपट्टी

मुंबईत गुरुवारी रात्री काही भागात पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आजही हलक्या पावसाची शक्यता आहे. पालघर आणि सिंधुदुर्गमध्येही हवामान ढगाळ राहील. पश्चिम विक्षोपामुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) हे बदल झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांसाठी आवाहन

काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषतः द्राक्ष, आंबा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पावसाच्या सावटाखाली खबरदारी घ्यावी.

पुढील 5 दिवसात पावसाची तीव्रता कमी होत असतानाच अधूनमधून वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी झाडाखाली किंवा पत्राच्या शेडखाली आश्रय घेणे टाळावे.

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content