Homeटॉप स्टोरी1717 उमेदवारांचे नशीब...

1717 उमेदवारांचे नशीब होणार मतदानाच्या चौथ्या टप्प्यात फायनल!

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्प्यासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत असून त्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 1717 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे, यासाठी एकूण 4264 उमेदवारीअर्ज दाखल झाले. उमेदवारीअर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 होती. दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी केल्यानंतर 1970 उमेदवारीअर्ज वैध ठरले.

चौथ्या टप्प्यात तेलंगणातील 17 लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 1488 उमेदवारीअर्ज दाखल झाले. त्याखालोखाल आंध्र प्रदेशातील 25 लोकसभा मतदारसंघांसाठी 1103 उमेदवारीअर्ज दाखल झाले. तेलंगणातील 7 – मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक 177 उमेदवारीअर्ज दाखल झाले. त्याखालोखाल याच राज्यातील 13 – नलगोंडा आणि 14 – भोंगीर या दोन्ही मतदारसंघांसाठी प्रत्येकी 114 उमेदवारीअर्ज दाखल झाले आहेत. चौथ्या टप्प्यासाठी लोकसभा मतदारसंघांकरीता सरासरी 18 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचा राज्य / केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील

 राज्य / केंद्रशासित प्रदेशचौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्याप्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांची संख्याछाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्याअर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची अंतिम संख्या
आंध्र प्रदेश251103503454
बिहार51455655
जम्मू-काश्मीर1392924
झारखंड41444745
मध्य प्रदेश81549074
महाराष्ट्र11618369298
ओडिशा4753837
तेलंगणा171488625525
उत्तर प्रदेश13360138130
पश्चिम बंगाल81387575
एकूण96426419701717 

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content