Monday, May 12, 2025
Homeमुंबई स्पेशलदादरच्या 'छबिलदास'ची वास्तू...

दादरच्या ‘छबिलदास’ची वास्तू उद्या करणार शंभरीत प्रवेश!

एखादी संस्था नव्हे तर एखाद्या शाळेची वास्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा त्या शाळेला त्या वास्तूला तेथील आजी / माजी शिक्षक, विद्यार्थी, हितचिंतक समाजाला होणारा आनंद हा केवळ शब्दातीत असतो. याच आनंदात सहभागी होण्याचं, “याची देही याची डोळा” पाहण्याचे सौभाग्य उद्या मुंबईतल्या दादरच्या ‘छबिलदास’वासियांना मिळणार आहे.

‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ संचालित दादरची छबिलदास शाळा नुकतीच शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून संस्थेने उद्या, मंगळवारी दिनांक १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थोचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध अभिनेते बाळ धुरी व कळसुत्री बाहुल्यांचे निर्मितीकार रामदास पाध्ये यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त आनंदाची पर्वणी म्हणजे संस्थेतील कला शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन तसेच ‘छबिलदास कल्चर सेंटर’चे उद्घाटन व समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी ‘छबिलदास वॉल’ यांचे आयोजन व उद्घाटन संपन्न होणार आहे. या सोहळ्यास जास्तीजास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी दिले आहे.

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content