Homeचिट चॅटठाण्याच्या श्री मावळी...

ठाण्याच्या श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १४ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३वी राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा मंगळवार, १४-०४-२०२६ ते शनिवार, १८-०४-२०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण रू. ३,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत पुरुष व महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५१,०००/- , उपविजेत्या संघाला ₹ ३१,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ ११,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पुरुष गटात व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ ५,०००/- , उत्कृष्ट चढाईपटू खेळाडूस ₹ ३,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ३,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ १,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघानी राज्याच्या संकेतस्थळावर (https://player.maharashtrakabaddi.com/Tournament/Default.aspx) प्रवेशअर्ज भरणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर भरलेल्या प्रवेशअर्जाची प्रत संघाची सही व शिक्क्यासह प्रवेश फीसहित श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) येथे जमा करावी. अन्यथा संघास स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही. सदर स्पर्धेसाठी प्रथम प्रवेशअर्ज सादर करणाऱ्या पुरुष गटातील ६४ व महिला गटातील १६ संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर ९९२०७७६३६१, ९८६७४२१५२४, ८४२२०९८८७८, ९६५३१७५९७० संपर्क साधावा.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content