Homeचिट चॅटठाण्याच्या श्री मावळी...

ठाण्याच्या श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १४ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३वी राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा मंगळवार, १४-०४-२०२६ ते शनिवार, १८-०४-२०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण रू. ३,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत पुरुष व महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५१,०००/- , उपविजेत्या संघाला ₹ ३१,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ ११,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पुरुष गटात व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ ५,०००/- , उत्कृष्ट चढाईपटू खेळाडूस ₹ ३,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ३,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ १,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघानी राज्याच्या संकेतस्थळावर (https://player.maharashtrakabaddi.com/Tournament/Default.aspx) प्रवेशअर्ज भरणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर भरलेल्या प्रवेशअर्जाची प्रत संघाची सही व शिक्क्यासह प्रवेश फीसहित श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) येथे जमा करावी. अन्यथा संघास स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही. सदर स्पर्धेसाठी प्रथम प्रवेशअर्ज सादर करणाऱ्या पुरुष गटातील ६४ व महिला गटातील १६ संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर ९९२०७७६३६१, ९८६७४२१५२४, ८४२२०९८८७८, ९६५३१७५९७० संपर्क साधावा.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content