Homeहेल्थ इज वेल्थ“टीबीमुक्त पंचायत” उपक्रमाचा...

“टीबीमुक्त पंचायत” उपक्रमाचा रायगड जिल्ह्यापासून शुभारंभ

राज्य टीबी मुक्त करण्याचा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचा संकल्प मिशन मोडवर पूर्ण करूया, असे आवाहन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी केले. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित “टीबीमुक्त पंचायत” अभियान उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त धीरज कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यातील दहा गावांमध्ये “टीबीमुक्त पंचायत” अभियानाची सुरूवात करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ सालापर्यंत “टीबीमुक्त भारत” करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत  देशभरातील १००० पंचायतींना टीबीमुक्त करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील “टीबीमुक्त पंचायत” अभियानाची सुरूवात रायगड जिल्ह्यातून करण्यात येत आहे. JSW foundationच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील दहा गावांमधील सुमारे दहा हजार नागरिकांची तपासणी करून टीबी रुग्णाचा शोध, निदान, उपचार व निर्मूलन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अभियानाच्या यशानंतर राज्यभर “टीबीमुक्त पंचायत” अभियान राबवण्यात येणार आहे.

या अभियानाला “द युनियन साऊथ इस्ट आशिया (USEA) यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार असून JSW foundation CSRमधून आर्थिक मदत होणार आहे. या बैठकीत MY LABचे handy x-ray मशीन तसेच, खोकल्याच्या आवाजावरून टीबी निदान करणाऱ्या एपचे  प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

कार्यक्रमास राज्याच्या टीबी विभाग सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, सहसंचालक रुग्णालय डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक डॉ. अशोक  रणदिवे, Jsw foundationचे आशिष जैन, USEA संस्थेचे प्रबोध भाम्बल, शंकर दापकेकर, इंडिया हेल्थ फंडचे माधव जोशी व गुरविंदर तसेच ठाणे, रायगड, पालघर व रत्नागिरी जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content