Homeपब्लिक फिगरअंबड पोलीसठाण्याच्या अधिकाऱ्यांना...

अंबड पोलीसठाण्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा!

धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या प्रकरणांमध्ये ज्यांच्याविरोधात तक्रार असते त्यांना ताकद देणारे नाशिकच्या अंबड पोलीसठाण्याचे अधिकारी भगीरथ देशमुख तसेच पोलीस नाईक प्रशांत नागरे यांना तातडीने निलंबित करून त्यांच्या विरोधात उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज नागपूर विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी विश्वासार्हता आहे. परंतु काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलावर नामुष्की येते. याच अधिवेशनामध्ये अहमदनगरच्या एका पोलिस अधिकाऱ्याची  सरकारने बदली केली तर त्याविरोधात तिथे प्रचंड मोठा जनसमुदाय रस्त्यावर उभा केला गेला. विरोधी पक्षाचे काही आमदारही यात सहभागी होते. बहुजनांना त्रास देणारे आणि जनतेविरुद्ध कारभार करणाऱ्या काही लोकांना पाठबळ देणारे असेच हे अंबड पोलीसठाण्याचे अधिकारी आहेत. या परिसरात आज अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात ते याच अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे… काय करायचे ते करा अशी हिम्मत या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये कशामुळे येते, असा सवाल त्यांनी केला.

कायद्यापेक्षा आपण मोठे आहोत अशा आविर्भावात हे अधिकारी वावरतात. यांच्याच कारकीर्दीत 2021-22 या कालखंडात खुनाच्या दहा घटना घडल्या. या दोघांकडे बंगले, गाड्या आहेत. इतके पैसे यांच्याकडे येतात कुठून, असा सवाल करत नितेश राणे यांनी या दोघांनाही तातडीने निलंबित करून त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय किंवा गुन्हा अन्वेषण खात्याकरवी चौकशी करावी अशी मागणी केली.

या सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून चौकशी केली जाईल. एका महिन्यात चौकशीचा अहवाल मागविला जाईल. त्याचप्रमाणे पोलीस नाईक नागरे यांची ताबडतोब बदली केली जाईल असे आश्वासन दिले.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content