Homeटॉप स्टोरीचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू

अनेक दिवसांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सुमारे साडेतीन लाख चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलनाचा पहिला दिवस यशस्वी केला. शासनाने दखल घेतली नाही तर, उद्या तीव्र निदर्शने आणि परवा (दि. 29 जानेवारी) एक दिवसाचा संप करण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरीत तोडगा काढावा, अन्यथा संपामुळे शासकीय यंत्रणा ठप्प होईल, असा इशारा राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.

शासनाला वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे, नाईलाजाने हा अखेरीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान महाराष्ट्रातील सर्व शासकीय कारभार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांशिवाय अशक्य असल्यामुळे सर्व शासकीय कामकाज ठप्प होणार असल्याने या प्रकरणी लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी राज्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

वर्ग-४ची पदे निरसित करू नयेत, दि. 14 जानेवारी, 2016 रोजीचा 25% चतुर्थश्रेणी पदे निरसित करण्याचा शासननिर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खाजगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्त्वावरील पदे त्वरीत भरली जावीत, राज्यातील वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास त्वरीत शासनसेवेत समाविष्ट करावे, सर्व शासकीय कार्यालयांतील चतुर्थश्रेणीची पदे सरळसेवा भरतीने त्वरीत भरावीत, ती बाह्यस्त्रोतांद्वारे भरू नयेत, वेतन त्रुटीसंदर्भात खंड-२च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, वर्षानुवर्षे कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे, आकृतीबंधानुसार सरळसेवेत तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील 925 चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून एकाच वेळी शासनसेवेत कायम करावे, राज्य सरकारी विमा योजना, मंत्रालय उपाहारगृहे, वस्तू व सेवा कर उपाहारगृहे, राज्य राखीव पोलिस बलातील वर्ग-४ची पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणीची पदे कंत्राटी पद्धतीने न भरता ती सरळसेवेने तत्काळ भरावीत, अशा विविध 25 मागण्या चतुर्थश्रेणी महासंघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत, असे पठाण यांनी म्हटले आहे.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content