Homeमुंबई स्पेशलकामगार एकता नागरी...

कामगार एकता नागरी पतपेढीची रौप्यमहोत्सवी सभा संपन्न

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)ची रौप्यमहोत्सवी अहवाल सभा कॉ. विठ्ठल घाग यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या प्रचंड उपस्थितीत काल मुंबईतल्या दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे पार पडली.

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)चे वैशिष्ट्य म्हणजे 25 वर्षांपूर्वी स्वान मिल कामगारांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून आपल्या गरजेपोटी ही पतपेढी सुरू केली. आज 25 वर्षांनंतर या पतपेढीत छोटे दुकानदार, भाजी विक्रेते, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिलाही सभासद झाल्या आहेत. या पतपेढीत 3860 सभासद आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या 7 कोटी 20 लाखांच्या ठेवी ठेवल्या आहेत. 2 कोटी 45 लाखांची गुंतवणूक पतपेढीने केली आहे. 61 लाखांचे भागभांडवल उभे केले आहे. 5 कोटी 70 लाखांचे कर्जवाटप आतापर्यंत केले आहे. अशा तऱ्हेने 13 कोटींचा समिश्र व्यवहार या 25व्या वर्षी पतपेढीने केला आहे.

ही पतपेढी गिरणी कामगारांची पतपेढी म्हणून ओळखली जाते. पतपेढीने गिरणी कामगारांना घरांसाठी 3 कोटी 50 लाखांचे कर्जवाटपसुद्धा केले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या सभेत सभासदांचे गुणवंत विद्यार्थी, ठेवीदार, नियमित कर्ज फेडणारे कर्जदार, ज्यांनी या पतपेढीला मदत केली असे सर्व सन्माननीय सभासद तसेच रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अंध शाळेतील मुलांचा व अनाथ मुलांचा संचालक मंडळाच्या हस्ते सन्मान करुन त्यांच्या शाळेला आर्थिक मदतही करण्यात आली. सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. सर्व कर्मचाऱ्यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले. कामगार क्षेत्रातील नेते कॉ. राजेंद्र कोरडे, कॉ. मनोज यादव, कॉ. अशोक पवार, गणेश घाग आदी मान्यवर तसेच सहकार क्षेत्रातील दिनेश नाईक उपस्थित होते.

यावेळी पतपेढीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या पतपेढीचे खरे मालक सर्व सभासद आहेत. तेव्हा तुम्ही भागभांडवल, ठेवी वाढावा. चांगले कर्जदार आणा. म्हणजे ही पतपेढी आपण आणखी मोठी करू. गिरणी कामगारांनी लढून मिळविलेले घर व ही पतपेढी वर्षानुवर्षे या मुंबई शहरात गिरणी कामगारांच्या लढ्याची ओळख जिवंत ठेवेल.

उपस्थित सर्व सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक, अध्यक्ष कॉ. विठ्ठल घाग, उपाध्यक्ष प्रवीण घाग, सेक्रेटरी शान्ताराम घाग, तज्ञ संचालक विलास घाग, प्रकाश गुणदेकर, सुधाकर गिरप, विनायक परब, मोहन कदम, यशवंत पाटेकर व खजिनदार उदय नेरुरकर हे संचालक उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून राष्ट्रगिताने सभा संपविण्यात आली.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content