Homeमुंबई स्पेशलकामगार एकता नागरी...

कामगार एकता नागरी पतपेढीची रौप्यमहोत्सवी सभा संपन्न

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)ची रौप्यमहोत्सवी अहवाल सभा कॉ. विठ्ठल घाग यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या प्रचंड उपस्थितीत काल मुंबईतल्या दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे पार पडली.

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)चे वैशिष्ट्य म्हणजे 25 वर्षांपूर्वी स्वान मिल कामगारांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून आपल्या गरजेपोटी ही पतपेढी सुरू केली. आज 25 वर्षांनंतर या पतपेढीत छोटे दुकानदार, भाजी विक्रेते, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिलाही सभासद झाल्या आहेत. या पतपेढीत 3860 सभासद आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या 7 कोटी 20 लाखांच्या ठेवी ठेवल्या आहेत. 2 कोटी 45 लाखांची गुंतवणूक पतपेढीने केली आहे. 61 लाखांचे भागभांडवल उभे केले आहे. 5 कोटी 70 लाखांचे कर्जवाटप आतापर्यंत केले आहे. अशा तऱ्हेने 13 कोटींचा समिश्र व्यवहार या 25व्या वर्षी पतपेढीने केला आहे.

ही पतपेढी गिरणी कामगारांची पतपेढी म्हणून ओळखली जाते. पतपेढीने गिरणी कामगारांना घरांसाठी 3 कोटी 50 लाखांचे कर्जवाटपसुद्धा केले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या सभेत सभासदांचे गुणवंत विद्यार्थी, ठेवीदार, नियमित कर्ज फेडणारे कर्जदार, ज्यांनी या पतपेढीला मदत केली असे सर्व सन्माननीय सभासद तसेच रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अंध शाळेतील मुलांचा व अनाथ मुलांचा संचालक मंडळाच्या हस्ते सन्मान करुन त्यांच्या शाळेला आर्थिक मदतही करण्यात आली. सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. सर्व कर्मचाऱ्यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले. कामगार क्षेत्रातील नेते कॉ. राजेंद्र कोरडे, कॉ. मनोज यादव, कॉ. अशोक पवार, गणेश घाग आदी मान्यवर तसेच सहकार क्षेत्रातील दिनेश नाईक उपस्थित होते.

यावेळी पतपेढीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या पतपेढीचे खरे मालक सर्व सभासद आहेत. तेव्हा तुम्ही भागभांडवल, ठेवी वाढावा. चांगले कर्जदार आणा. म्हणजे ही पतपेढी आपण आणखी मोठी करू. गिरणी कामगारांनी लढून मिळविलेले घर व ही पतपेढी वर्षानुवर्षे या मुंबई शहरात गिरणी कामगारांच्या लढ्याची ओळख जिवंत ठेवेल.

उपस्थित सर्व सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक, अध्यक्ष कॉ. विठ्ठल घाग, उपाध्यक्ष प्रवीण घाग, सेक्रेटरी शान्ताराम घाग, तज्ञ संचालक विलास घाग, प्रकाश गुणदेकर, सुधाकर गिरप, विनायक परब, मोहन कदम, यशवंत पाटेकर व खजिनदार उदय नेरुरकर हे संचालक उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून राष्ट्रगिताने सभा संपविण्यात आली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content