Homeपब्लिक फिगरमहिलांवर हात टाकणाऱ्या...

महिलांवर हात टाकणाऱ्या शिवसैनिकांना देणार ‘शिवथाळी’!

शिवसेनाभवनावर जाऊन निषेध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचे हात-पाय आम्ही विसरणार नाही. त्यांच्या प्रसादाची परतफेड कशी करायची हे आम्ही शिवसेनेतच शिकलो आहोत. योग्य वेळी त्यांना शिवथाळी दिली जाईल, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिला.

महिलांवर लपूनछपून हल्ला करणाऱ्या शिवसेनेचा निषेध करतच त्यांनी या पत्रकार परिषदेला सुरूवात केली. शिवसैनिकांच्या या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, सेनाभवन मराठी माणसाचे आहे, पवित्र आहे. तेथे हल्ला करायला आलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही शिवप्रसाद दिला आहे. पुढे शिवथाळी देऊ.. या राऊतांना सेनाभवनाची इतिहास तरी माहित आहे का? जेव्हा शिवसेनाभवन उभे राहिले तेव्हा हेच राऊत लोकप्रभेत काम करत शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एकदम खालच्या पातळीची टीका करत होते. माझ्याकडे सर्व अंक आहेत. छापू का ते काय म्हणत होते ते.. ‘प्रहार’मध्ये.. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे गोळा करून, वर्गणी काढून हे सेनाभवन बांधले. तुमचे योगदान काय? तुम्ही नोकरी करत होता. नंतर कधी शिवसैनिक झालात, कधी नेते.. आम्हाला माहित नाही काय, असा सवाल राणे यांनी केला.

शिवथाळीही सरकारचीच

शिवथाळीही तुमची नाही. ती सरकारची आहे. राहिला प्रश्न प्रसादाचा. हिंदू धर्मात आम्ही देवदेवतांना पवित्र मानतो. त्यांच्या समोर नैवेद्य ठेवतो आणि मग त्यातला काही भाग प्रसाद म्हणून वाटतो. तुम्ही प्रसाद शब्द वापरून हिंदुत्वाची, देवदेवतांची चेष्टा केली आहे, हे लक्षात ठेवा. तुमचे नेते, आताचे मुख्यमंत्री हिंदुत्वाला तिलांजली देऊनच मुख्यमंत्री झाले. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्वाचे महत्त्व सांगण्याचा अधिकारच नाही. संजय राऊत यांनी दाखवलेला हा पुळका फक्त स्वार्थासाठी आहे. दादागिरीची भाषा तुम्ही करू नका. आम्ही फक्त शिवथाळीच नाही तर नॉनव्हेज बिर्यानीही खायला घालू, हे लक्षात ठेवा. स्वतःला सांभाळा. आपल्या वाट्याला कधी बिर्यानी येईल ते सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.

ही शिवसेना शिवसैनिकांची नाही. ज्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य वेचले. हालअपेष्टा काढल्या..  त्यांना आजपर्यंत काही मिळाले नाही. ही उद्धव, आदित्य यांची सेना आहे. जिवाची पर्वा न करता ज्यांनी काम केले ते सत्तेत कुठेच नाहीत. आज फक्त लाभ उठवणाऱ्यांची सेना आहे. महिलांना असभ्य न बोलणाऱ्या, त्यांच्यावर हात न टाकणाऱ्या कडवट शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा, अशा शब्दांत राणे यांनी खऱ्याखुऱ्या शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

ही बिनशिंगाची शिवसेना

कुडाळमध्ये पेट्रोलपंपावर आंदोलन करणारे वैभव नाईक याच थाळीतली एक भाजी आहेत. आपल्यालाही कधी शिवथाळी मिळेल हे ओळखून ते पळाले. तुमच्यासाठी शिवसेनाभवन मंदिर असेल तर अयोध्येतील श्री राम मंदिर आमचे श्रद्धास्थान आहे. आमची अस्मिता आहे. सोनियासेना या नात्याने त्यावर टीका करता, हे आम्ही सहन करणार नाही. आले अंगावर म्हणणाऱ्या शिवसेनेला शिंगे आहेत कुठे, असा सवाल करत नारायण राणे म्हणाले की, ही बिनशिंगांची शिवसेना आहे. फटके देणारी शिवसेना केव्हाच संपली. आता फक्त पैसे जमव शिवसेना राहिली आहे. महिलांवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना भाजपा स्टाईलने उत्तर दिले जाईल. आणि जेव्हा राणे त्यात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळण्यासाठी जागाही शिल्लक ठेवत नाही, हे सर्वांना माहित आहे.

महिलांवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांची पाठ थोपटणाऱ्या मुख्यमंत्र्यांना याची कशी परतफेड होईल हे कळणारही नाही. देवदेवतांनाच वाटते आता यांना जास्त वेळ बसवणे योग्य नव्हे. त्यामुळे तेच त्यांना बाजूला सारतील, असेही ते म्हणाले.

सिंधुदूर्गात फक्त दोन डॉक्टर..

सिंधुदूर्गात फक्त दोन डॉक्टर आहेत. एक त्वचेचा आणि दुसरा दातांचा. हे दोन डॉक्टर कोरोनावर उपचार करणार. आज एक हजार लोक फक्त सिंधुदूर्गात मेले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गात मिळून पावणेतीन हजार जण कोरोनामुळे दगावले. नर्स नाहीत, वॉर्डबॉय नाहीत, औषधे नाहीत, ही अवस्था आहे. आरोग्यमंत्री भेट देत आहेत तेव्हा त्यांना कळेल, ते पाहतील, असेही राणे यांनी सांगितले.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content