Monday, May 12, 2025
Homeएनसर्कलसुदर्शन पटनायक यांचे...

सुदर्शन पटनायक यांचे ‘मेरा पहला वोट देश के लिये’.. 

‘मेरा पहला वोट देश के लिए’ या मोहिमेला देशभरात गती देण्याच्या प्रयत्नात ख्यातनाम वालुकाशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओरिसात जगन्नाथ पुरीच्या सागर किनाऱ्यावर वालुकाशिल्प साकारले आहे. या शिल्पातून त्यांनी युवकांना तसेच मतदानात पहिल्यांदाच भाग घेत असणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीला मजबूत आणि समृद्ध करण्याचा संदेश दिला आहे.

पटनायक यांच्या कलेची प्रशंसा करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हे वाळूवर साकारलेलं  शिल्प नसून प्रत्येक भारतीयाच्या मनावर उमटलेला ठसा आहे. आपल्या एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात मंत्रिमहोद म्हणतात की #MeraPehlaVoteDeshKeliye, मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदाराच्या मनामध्ये या लोकशाही प्रक्रियेचा भाग होण्याची अनोखी उत्सुकता जागी करत आहे. या भावनेची उत्कृष्ट उभारणी या वाळूवर झालेली आपण बघत आहोत.

‘मेरा पहला वोट देश के लिए’ ही मोहीम देशातील वेगवेगळ्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबवली जात आहे. तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे आणि देशाच्या भल्यासाठी मतदान करण्याचे महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मोहिमेमुळे निवडणुकीचे महत्त्व आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मतदान करण्याचा अभिमान या गोष्टी ठळक होत आहेत.

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content