Homeडेली पल्ससयाजी नगरी एक्सप्रेस...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि कार्यात्मक उत्कृष्टतेविषयी जागरूकता दाखवताना पश्चिम रेल्वेने 344 किमी अंतराच्या विरार-सूरत-बडोदा विभागात प्रवासी सेवांसाठी स्वदेशी बनावटीची रेल्वे संरक्षण प्रणाली, ‘कवच 4.0’, कार्यान्वित केली आहे. काल, 30 जानेवारीला गाडी क्रमांक 20907 दादर-भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली ट्रेन ठरली आणि भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

कवच तंत्रज्ञान विरार-सूरत-बडोदा विभागाच्या 344 किमी मार्गावर कार्यान्वित करण्यात आले आहे. या मार्गावर, 49 स्थानके, 57 रेडिओ कम्युनिकेशन टॉवर्स आणि सुमारे 700 किमी ऑप्टिकल फायबर केबलच्या सहाय्याने कवच प्रणाली लागू करण्यात आली आहे. धोक्याच्या सिग्नलवर पुढे जाणे, अतिवेग आणि धडकणे यासारख्या मानवी चुकांमुळे होणारे धोके कमी करण्याकरीता ही कवच प्रणाली उपयोगी ठरते. ‘लेव्हल क्रॉसिंगवर ऑटो-व्हिसलिंग’ म्हणजेच स्वयंचलित शिट्टी वाजवणे आणि केबिनमध्ये सिग्नलच्या स्थितीची जाणीव करून देणे यासारख्या वैशिष्ट्यांद्वारे प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीची सूचना या प्रणालीमुळे मिळते.

पश्चिम रेल्वेने यापूर्वी मागच्या महिन्यात डिसेंबर 2025मध्ये बडोदा-अहमदाबाद विभागात कवच प्रणाली कार्यान्वित केली होती. विरार-बडोदा विभाग कार्यान्वित झाल्यामुळे, आजपर्यंत पश्चिम रेल्वेवर एकूण 435 मार्ग किलोमीटरवर कवच प्रणाली कार्यान्वित झाली आहे. आधीच कार्यान्वित झालेल्या विभागांव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेच्या इतर अनेक विभागांवर 2667 मार्ग किलोमीटरवर कवच प्रणालीच्या कामासाठी अंदाजे 1435 कोटी रुपये खर्च केला जात आहे. याव्यतिरिक्त 2476 मार्ग किलोमीटरवरील पुढील कामांना मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे त्यांच्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कवर ‘कवच’ प्रणालीचा विस्तार करणार आहे.

Continue reading

मोजतबा खामेनी यांच्या पोस्टरमुळे इराणमध्ये खळबळ

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांचे फोटो अचानक 'शहीद' पोस्टर्सवर झळकल्याने इराणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सहसा अशी पोस्टर्स युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी किंवा अत्यंत महत्त्वाच्या दिवंगत नेत्यांसाठी वापरली जातात. मोजतबा जिवंत असतानाही त्यांचा...

टिटवीच्या अंड्यांमध्ये दडलेय पावसाचे रहस्य!

देशातील काही भागात शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, टिटवीची अंडी मान्सूनच्या आगमनाचे आणि तीव्रतेचे अचूक संकेत देतात. टिटवीने दिलेल्या अंड्यांची संख्या, अंडी घालण्याची जागा यानुसार पारंपरिकरित्या, पिढ्या न् पिढ्या देशाच्या काही भागात मान्सूनच्या पावसाचे ठोकताळे आणि अंदाज बांधले जातात. अंड्यांची...

आता देशातच बनणार एमआरआय मशिन, चाचण्यांचे दर होणार ७०%पर्यंत कमी!

भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित 'व्होक्सेल ग्रिड्स' या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय...
Skip to content