Homeडेली पल्ससयाजी नगरी एक्सप्रेस...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि कार्यात्मक उत्कृष्टतेविषयी जागरूकता दाखवताना पश्चिम रेल्वेने 344 किमी अंतराच्या विरार-सूरत-बडोदा विभागात प्रवासी सेवांसाठी स्वदेशी बनावटीची रेल्वे संरक्षण प्रणाली, ‘कवच 4.0’, कार्यान्वित केली आहे. काल, 30 जानेवारीला गाडी क्रमांक 20907 दादर-भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली ट्रेन ठरली आणि भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

कवच तंत्रज्ञान विरार-सूरत-बडोदा विभागाच्या 344 किमी मार्गावर कार्यान्वित करण्यात आले आहे. या मार्गावर, 49 स्थानके, 57 रेडिओ कम्युनिकेशन टॉवर्स आणि सुमारे 700 किमी ऑप्टिकल फायबर केबलच्या सहाय्याने कवच प्रणाली लागू करण्यात आली आहे. धोक्याच्या सिग्नलवर पुढे जाणे, अतिवेग आणि धडकणे यासारख्या मानवी चुकांमुळे होणारे धोके कमी करण्याकरीता ही कवच प्रणाली उपयोगी ठरते. ‘लेव्हल क्रॉसिंगवर ऑटो-व्हिसलिंग’ म्हणजेच स्वयंचलित शिट्टी वाजवणे आणि केबिनमध्ये सिग्नलच्या स्थितीची जाणीव करून देणे यासारख्या वैशिष्ट्यांद्वारे प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीची सूचना या प्रणालीमुळे मिळते.

पश्चिम रेल्वेने यापूर्वी मागच्या महिन्यात डिसेंबर 2025मध्ये बडोदा-अहमदाबाद विभागात कवच प्रणाली कार्यान्वित केली होती. विरार-बडोदा विभाग कार्यान्वित झाल्यामुळे, आजपर्यंत पश्चिम रेल्वेवर एकूण 435 मार्ग किलोमीटरवर कवच प्रणाली कार्यान्वित झाली आहे. आधीच कार्यान्वित झालेल्या विभागांव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेच्या इतर अनेक विभागांवर 2667 मार्ग किलोमीटरवर कवच प्रणालीच्या कामासाठी अंदाजे 1435 कोटी रुपये खर्च केला जात आहे. याव्यतिरिक्त 2476 मार्ग किलोमीटरवरील पुढील कामांना मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे त्यांच्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कवर ‘कवच’ प्रणालीचा विस्तार करणार आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content