Homeमुंबई स्पेशलरस्त्यांकडच्या झाडांखालील पार्क...

रस्त्यांकडच्या झाडांखालील पार्क मोटारी हटवा!

पावसाळ्यात रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या पडून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्याकरीता मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वृक्षछाटणीच्या कामांत रस्त्यांच्या कडेला उभ्या (पार्क) असलेल्या मोटारी अडथळा ठरत असून वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभी करू नयेत, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

मोटारी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मान्सूनपूर्व कामांतर्गत मृत/धोकादायक झाडे व फांद्या यांची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विभागवार नेमलेल्या ठेकेदारामार्फत हे काम करण्यात येत आहे. तथापि बऱ्याच रस्त्यांवर पार्क केलेल्या गाड्यांमुळे ही कामे करताना अडथळा निर्माण होतो. अनेकदा अनावश्यक विवादही उत्पन्न होतो. परिणामी या धोकादायक अथवा मृत झाडांची छाटणी करता येत नाही व ही झाडे अथवा फांद्या पावसात वादळात पडून नागरिकांची जीवित/वित्त हानी संभवते.

नागरिकांनी याकामी सहकार्य केल्यास ही कामे पार पाडून हा धोका टाळता येऊ शकतो. तरी मुंबईतील नागरिकांनी वृक्षछाटणी चालू असलेल्या ठिकाणाहून आपल्या पार्क केलेल्या गाड्या हटवून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागातर्फे करण्यात आले आहे.

मोटारी

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content