Homeकल्चर +16 ऑगस्टपासून अमृत...

16 ऑगस्टपासून अमृत उद्यान पुन्हा जनतेसाठी खुले!

उद्यान उत्सव-II च्या अंतर्गत दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यान, 16 ऑगस्ट 2023 पासून एका महिन्यासाठी (सोमवार वगळता) नागरिकांसाठी खुले होणार आहे. 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनानिमित्त ते केवळ शिक्षकांसाठीच खुले असेल.

अभ्यागतांना, उन्हाळ्यातील वार्षिक फुलांचे दर्शन घडवून आणणे हा या उद्यान उत्सव-II चा हेतू आहे. अभ्यागत, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत (अंतिम प्रवेश दुपारी 4 वाजेपर्यंत) या उद्यानाला भेट देऊ शकतात. अभ्यागतांना उत्तर मार्गाजवळील राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक 35 मधून प्रवेश दिला जाईल.

प्रवेशासाठी, 7 ऑगस्ट 2023 पासून राष्ट्रपती भवनाच्या (https://visit.rashtrapatibhavan.gov.in/) या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग करता येईल. थेट प्रवेशासाठी अभ्यागतांना प्रवेशद्वार क्रमांक 35 येथील सेल्फ सर्व्हिस किऑस्क (स्वयं सेवा सुविधा) च्या माध्यमातून पास मिळू शकतात. अमृत उद्यानात प्रवेश विनामूल्य आहे.

चालू वर्षी, 29 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत उद्यान उत्सव-1 अंतर्गत अमृत उद्यान खुले करण्यात आले होते त्यावेळी या उद्यानाला 10 लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली होती.

या अमृत उद्यानासोबतच, अभ्यागत राष्ट्रपती भवनाच्या (https://visit.rashtrapatibhavan.gov.in/) या संकेतस्थळावरून उपलब्ध जागा ऑनलाइन बुक करून राष्ट्रपती भवन संग्रहालयालाही भेट देऊ शकतात. या उद्यान उत्सव-2 दरम्यान, सरकारी शाळांचे विद्यार्थी संग्रहालयाला मोफत भेट देऊ शकतात.

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content