Homeटॉप स्टोरीरविवारी राहुल गांधी...

रविवारी राहुल गांधी फुंकणार निवडणूक प्रचाराचे रणशिंग

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज, मंगळवारी दुपारी २ वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. उद्या, १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्चला पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. रविवारी, १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ६७ दिवसांत ६७००

किलोमीटरचा प्रवास करत आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक’ या घोषवाक्यासह ही यात्रा मार्गक्रमण करत आहे.

मागील वर्षी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४००० किमीची पदयात्रा काढली होती. या यात्रेला जनतेचे प्रचंड समर्थन लाभले होते तसाच भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षाकडून भारत जोडो न्याय यात्रेत अडथळे आणण्याचा जाणीवपूर्क प्रयत्न केला गेला. पण यात्रा न डगमगता सुरुच राहिली. भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी व न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेत व शिवाजी पार्क वरील जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना प़टोले यांनी केले आहे.

Continue reading

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...

पदवीही नाही, तरी १९ वर्षीय भारतीय तरुणी ‘बीएमडब्ल्यू’मध्ये!

"नोकरी मिळवण्यासाठी पदवी हवीच", या पारंपरिक समजाला छेद देणारी एक खळबळजनक घटना सध्या कॉर्पोरेट जगतात चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या एका भारतीय तरुणीने, कोणतीही पदवी (डिग्री) किंवा औपचारिक कॉर्पोरेट अनुभव नसताना, थेट 'बीएमडब्ल्यू'सारख्या जागतिक ऑटोमोबाईल दिग्गज कंपनीत...

वेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत श्वेता, पल्लवीला कांस्य

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित केलेल्या वेटरन्स मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघींनी कांस्यपदकाची कमाई केली. ३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी वयोगटात श्वेता ठाकूरने अभिनव प्रकाशसोबत कांस्यपदक...
Skip to content