Homeपब्लिक फिगरराजकारणच नाही तर...

राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे दमानियांचे षडयंत्र!

कृषी साहित्यखरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषीखरेदीबाबत सुरुवातीला उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला. त्यांनी तो भरलासुद्धा. ऑफिस ऑफ प्रॉफिट, पिक विमा असा कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. मात्र माझ्या बदनामीच्या ट्रायल रंगवून दाखवल्या गेल्या. हे एक मोठे षडयंत्र असून, मला केवळ राजकारण किंवा समाजकारण यामधून संपवायचे नाही तर काही लोकांना मी या पृथ्वीतलावर नको आहे. त्यातून हे सगळे घडवून आणले जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

आज मुंबईत विधानभवन येथे मुंडे यांनी बऱ्याच दिवसांनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या कृषीमंत्रीपदी असताना केलेल्या कृषी साहित्य खरेदी संदर्भात उच्च न्यायालयापाठोपाठ राज्याच्या लोकायुक्तांनीदेखील आपल्याविरुद्ध केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण शासनाच्या नियमानुसार व शेतकऱ्यांचे हित समोर ठेऊनच संबंधित खरेदीबाबतचा निर्णय घेतला होता. या प्रकरणात न्यायव्यवस्था आणि नियतीने सत्य समोर आणले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया यांच्याबाबत विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की, त्यांनी संपूर्ण जीवनात माझ्यासह नितीन गडकरी, अजितदादा, खडसे, भुजबळ, तटकरे, अशा अनेक नेत्यांवर ढीगभर आरोप करून बदनामी केली. मात्र त्यांनी केलेला एकतरी आरोप कुठे सिद्ध झाला का? केवळ खोटे पुरावे समोर आणायचे, माध्यमांच्या समोर सनसणी निर्माण करायची आणि एखाद्याला बदनाम करायचे, हे सगळे थांबवले गेले पाहिजे. आपल्या प्रकरणात आपण सध्यातरी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार नसल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले.

दरम्यान मागील काही महिन्यांपासून आपल्याविरुद्ध मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्यातूनच रोज नवनवीन आरोप आणि बदनामीची एक अजब मालिका सुरू आहे. मात्र न्यायव्यवस्थेसमोर एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आपली बाजू सत्याची आणि त्यामुळेच नियती आपल्या सोबत आहे. त्यामुळे सहकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Continue reading

मुंबई-नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये भाड्याच्या जागेत!

'आयकर सिंधु'च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...
Skip to content