Homeपब्लिक फिगर‘त्या’ १६ आमदारांच्या...

‘त्या’ १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच योग्य निर्णय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल कायद्यानुसार लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

आपला चार दिवसांचा शासकीय दौरा आटोपून लंडनहून मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. उद्धव ठाकरे गटाच्या काही आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिलेल्या ७९ पानांच्या निवेदनाचाही अभ्यास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

त्याआधी आज ठाकरे गटाच्या विधानसभा तसेच विधान परिषदेच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विधान भवनातल्या कार्यालयात त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ७९ पानी निवेदन दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनात समाविष्ट केला गेला आहे. या निर्णयाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने या निवेदनाद्वारे केली आहे.

त्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. हा निर्णय तातडीने घ्यावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिले. अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हे निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर अध्यक्षांनी यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशा मागणीचे पत्र दिल्याचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी नंतर माध्यमांना सांगितले.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content