Homeचिट चॅटसाहित्य संमेलनाध्यक्षांना मिळावा...

साहित्य संमेलनाध्यक्षांना मिळावा ‘विशेष राज्य अतिथी’चा दर्जा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून ‘विशेष राज्य अतिथी’ हा राजशिष्टाचार दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना बेडकिहाळ यांनी सांगितले की, दि. 17 व 18 जानेवारी 2023 रोजी इंदूर येथे ‘प्रांतीय मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलन’ पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी म. सा. प.चे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांची निवड झाली होती. त्यावेळी मध्य प्रदेश सरकारने प्रा. जोशी यांना जाण्या-येण्याच्या प्रवासासह इंदूर येथील वास्तव्यात ‘विशेष राज्य अतिथी’ दर्जा दिला होता. शिवाय राजशिष्टाचार म्हणून एक्सॉर्टसह वाहन, संरक्षण, निवास आदी व्यवस्था देण्यात आल्या होत्या.

मध्य प्रदेश सरकारने मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल जशी उदार भूमिका दाखवली त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या प्रचार, प्रसार व संवर्धनासाठी राज्य अतिथी दर्जाचा राजशिष्टाचार द्यावा. दि. 3 फेब्रुवारी रोजी वर्धा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करावी आणि त्याच दिवसापासून संमेलनाध्यक्षांना असा विशेष दर्जा देण्याचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या मागणीबाबतचा ठराव नुकत्याच पुणे येथे झालेल्या म. सा. प. कार्यकारी मंडळ सभेत आपण मांडला असून तो सर्वानुमते मंजूर झाल्याची माहितीही बेडकिहाळ यांनी दिली.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content