Homeपब्लिक फिगरयकृत आणि पित्त...

यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती मुर्मू झाल्या सहभागी!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्ली येथे यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेच्या (आयएलबीएस) नवव्या दीक्षांत समारंभात नुकत्याच सहभागी झाल्या. त्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधितही केले.

आयएलबीएस ने केवळ 13 वर्षांच्या कालावधीत जागतिक दर्जाची कार्यक्षमता आणि सचोटीच्या बळावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आय. एल. बी. एस.मध्ये 1000हून अधिक यकृत प्रत्यारोपण आणि अंदाजे 300 मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. तुलनेने कमी खर्चात जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवून आय. एल. बी. एस. सारख्या संस्थांच्या बळावर भारत आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जीवन विज्ञान आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. आयएलबीएसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यास विभागाची स्थापना हा एक समयोचित उपक्रम आहे. आय. एल. बी. एस.ने उपचार करण्याबरोबरच संशोधन क्षेत्रात काम करत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यकृत हे आपल्या शरीराचे सुरक्षारक्षक आहे. आपल्या देशात यकृताशी संबंधित आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत आणि त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे रोग हे चिंतेचे कारण आहेत. यकृताचे आजार रोखण्यासाठी आय. एल. बी. एस. महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.

पुरेशा संख्येने अवयव उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्ण यकृत, मूत्रपिंड किंवा इतर प्रत्यारोपणापासून वंचित राहतात. दुर्दैवाने, अवयवदानाशी संबंधित अनैतिक व्यवहार देखील वेळोवेळी प्रकाशात येतात. या समस्यांचे निराकरण करणे ही जागरूक समाजाची जबाबदारी आहे. आपल्या देशात अवयवदानाबद्दल लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकाधिक जनजागृती मोहिमा आयोजित करण्याची गरज आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

डॉक्टरांनी स्वतःची काळजी घ्यावी. कामाच्या लांबणाऱ्या वेळा, सततचे आपत्कालीन उपचार आणि रात्रीची कामे यासारख्या आव्हानांमध्ये, डॉक्टरांना सतत पूर्ण सतर्कतेने आणि उत्साहाने रुग्णांची सेवा करावी लागते. त्यामुळे, सर्व आव्हाने असूनही, त्या सर्वांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या निरोगी आणि सतर्क राहणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content