Homeमुंबई स्पेशलआमची पुढची पिढी...

आमची पुढची पिढी आता मोठ्या जागेत जाणार!

गेल्या तीन पिढ्या आमच्या बी डी डी चाळीतील छोट्याशा जागेत गेल्या. आता आमची पुढची पिढी तरी मोठ्या जागेत जाईल, अशी आशा बी डी डी चाळीतील ७४ वर्षांच्या सविता पेवेकर यांनी व्यक्त केली.

गेली अनेक वर्ष संपूर्ण इमारत एका कुटुंबासारखी राहिली. एकमेकांच्या सुखदु:खात, अडचणीत एकमेकांना मदत केली. भविष्यातसुद्धा असेच मोठे कुटूंब मोठ्या जागेत राहील अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली.

पिढी

बी डी डी चाळ ही एक संस्कृती आहे. इथून आजपर्यंत अनेक कलाकार रंगभूमीवर गेले. देशाला अनेक खेळाडू दिले. चाळ जरी असली तरी अनेक प्रतिभावंत या संस्कृतीतून घडले आणि मोठे झाले. आजपर्यंत भाडेकरू म्हणून राहिलेल्या सर्व रहिवाशांच्या या जागेचा पुनर्विकास होऊन यापुढे ते आपल्या हक्काच्या घराचे मालक होणार आहेत, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. बी डी डी चाळ ही मुंबापुरीची ओळख आहे. ती टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

ना म जोशी मार्ग, बीडीडी चाळ रहिवासी संघाचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे म्हणाले की,  मंत्रीमहोदय जितेंद्र आव्हाड स्वतः चाळीत राहिलेले असल्यामुळे येथील रहिवाशांची समस्या त्यांना जवळून माहित आहे. त्यामुळे या प्रकल्पाला त्यांच्या कार्यकाळात लवकरच गती येईल अशी आम्हा सर्व रहिवाशांना आशा आहे.

ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी पुनर्विकासाला पाठींबा दिला आणि आज येथील पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील अर्ध्यापेक्षा जास्त रहिवाशांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जवळच देऊ केलेल्या  संक्रमण शिबिरात स्थलांतर केले आहे. उर्वरित लोकांचे लवकरच शंकानिरसन करून त्यांचेही स्थलांतर  करण्यात येईल. तात्पुरते असले तरी उत्तम संक्रमण शिबीर राहण्यासाठी रहिवाशांना शासनाने दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.   

या बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाला काही मंडळी विरोध करीत आहेत. मात्र त्यांच्या सर्व मागण्या त्यांनी ऐकून घेऊन त्यांच्याशी योग्य असा संवाद साधून पुनर्विकासाचा मार्ग सुकर कसा होईल यावर लक्ष दिले. त्याचप्रमाणे स्वतः वेळोवेळी पुनर्विकासाच्या बाजूने आणि विरोधात असणाऱ्या लोकांशी संवाद साधून हा पुनर्विकास मार्गी लावण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील हा महाविकास आघाडीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथील रहिवाशांसाठी नक्कीच चांगला ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content