Homeमुंबई स्पेशलआमची पुढची पिढी...

आमची पुढची पिढी आता मोठ्या जागेत जाणार!

गेल्या तीन पिढ्या आमच्या बी डी डी चाळीतील छोट्याशा जागेत गेल्या. आता आमची पुढची पिढी तरी मोठ्या जागेत जाईल, अशी आशा बी डी डी चाळीतील ७४ वर्षांच्या सविता पेवेकर यांनी व्यक्त केली.

गेली अनेक वर्ष संपूर्ण इमारत एका कुटुंबासारखी राहिली. एकमेकांच्या सुखदु:खात, अडचणीत एकमेकांना मदत केली. भविष्यातसुद्धा असेच मोठे कुटूंब मोठ्या जागेत राहील अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली.

पिढी

बी डी डी चाळ ही एक संस्कृती आहे. इथून आजपर्यंत अनेक कलाकार रंगभूमीवर गेले. देशाला अनेक खेळाडू दिले. चाळ जरी असली तरी अनेक प्रतिभावंत या संस्कृतीतून घडले आणि मोठे झाले. आजपर्यंत भाडेकरू म्हणून राहिलेल्या सर्व रहिवाशांच्या या जागेचा पुनर्विकास होऊन यापुढे ते आपल्या हक्काच्या घराचे मालक होणार आहेत, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. बी डी डी चाळ ही मुंबापुरीची ओळख आहे. ती टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

ना म जोशी मार्ग, बीडीडी चाळ रहिवासी संघाचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे म्हणाले की,  मंत्रीमहोदय जितेंद्र आव्हाड स्वतः चाळीत राहिलेले असल्यामुळे येथील रहिवाशांची समस्या त्यांना जवळून माहित आहे. त्यामुळे या प्रकल्पाला त्यांच्या कार्यकाळात लवकरच गती येईल अशी आम्हा सर्व रहिवाशांना आशा आहे.

ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी पुनर्विकासाला पाठींबा दिला आणि आज येथील पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील अर्ध्यापेक्षा जास्त रहिवाशांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जवळच देऊ केलेल्या  संक्रमण शिबिरात स्थलांतर केले आहे. उर्वरित लोकांचे लवकरच शंकानिरसन करून त्यांचेही स्थलांतर  करण्यात येईल. तात्पुरते असले तरी उत्तम संक्रमण शिबीर राहण्यासाठी रहिवाशांना शासनाने दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.   

या बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाला काही मंडळी विरोध करीत आहेत. मात्र त्यांच्या सर्व मागण्या त्यांनी ऐकून घेऊन त्यांच्याशी योग्य असा संवाद साधून पुनर्विकासाचा मार्ग सुकर कसा होईल यावर लक्ष दिले. त्याचप्रमाणे स्वतः वेळोवेळी पुनर्विकासाच्या बाजूने आणि विरोधात असणाऱ्या लोकांशी संवाद साधून हा पुनर्विकास मार्गी लावण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील हा महाविकास आघाडीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथील रहिवाशांसाठी नक्कीच चांगला ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content