Homeटॉप स्टोरीदर तासाला एक...

दर तासाला एक शेतकरी करतो भारतात आत्महत्त्या!

भारतात दर तासाला एक शेतकरी आत्महत्त्या करत असल्याचे वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातूनच  समोर आले आहे. आत्महत्त्या करणाऱ्यांपैकी सर्वाधिक 38.5% शेतकरी महाराष्ट्रातील असून, त्यानंतर कर्नाटक (22.5%), आंध्र प्रदेश (8.6%), मध्य प्रदेश (7.2%) आणि तामिळनाडू (5.9%) या राज्यांचा क्रमांक लागतो. एकेकाळी समृद्ध कृषी वारशावर भरभराटीला आलेले, परंतु आता नैराश्य आणि यातनांनी व्यापलेले हे प्रदेश आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की, 2023मध्ये, शेती क्षेत्रात काम करणारा किमान एक व्यक्ती दर तासाला आत्महत्त्या करून मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे शेती करणाऱ्या कुटुंबावर असलेल्या वाढत्या आर्थिक ताणावर अधिक प्रकाश पडतो.

आत्महत्त्यांपैकी 43% शेतकरी, उर्वरित शेतमजूर

2023मध्ये, शेती क्षेत्रात गुंतलेल्या एकूण 10,786 व्यक्तींचा मृत्यू झाला, जो देशातील एकूण 1,71,418 आत्महत्त्याग्रस्तांपैकी 6.3% होता. तथापि, मागील वर्षाच्या, 2022च्या तुलनेत आत्महत्त्यांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. परंतु तीव्रता आणि कारणे तीच राहिली आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की, एकूण आत्महत्त्यांपैकी 43% शेतकरी आहेत, तर उर्वरित शेतमजूर आहेत. एकूण 4,690 शेतकरी आणि 6,096 शेतमजूरांनी आत्महत्त्या केल्या. आत्महत्त्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 4,553 पुरुष आणि 137 महिला होत्या.

पश्चिम बंगाल, ईशान्येसह काही राज्यं आत्महत्त्यामुक्त

दुसरीकडे, काही प्रमुख राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये आत्महत्त्येचे प्रमाण शून्य झाल्याचे अहवालातून दिसत आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली आणि लक्षद्वीप राज्यांनी ही किमया साधली आहे. 2022मध्ये, उत्तराखंडमध्ये आत्महत्त्यांची संख्या शून्य होती, परंतु 2023मध्ये, तिथे आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली. तथापि, यावर्षी झारखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकही आत्महत्त्या नोंदवली गेली नाही, तर गेल्या वर्षी, त्यात वाढ झाली होती.

देशातील एकूण आत्महत्त्यांमध्ये वाढ

2022मध्ये, शेती क्षेत्रातील आत्महत्त्यांची संख्या तुलनेने जास्त होती. त्यावर्षी शेतीशी संबंधित एकूण 11,290 व्यक्तींनी आत्महत्त्या केल्या. त्यात 5,207 शेतकरी आणि 6,063 शेतमजूर होते. एकूण 5,207 शेतकरी आत्महत्त्यांपैकी एकूण 4,999 पुरुष आणि 208 महिला होत्या. त्याचप्रमाणे, 2022मध्ये शेती कामगारांनी केलेल्या 6,083 आत्महत्त्यांपैकी 5,472 पुरुष आणि 611 महिला होत्या. दरम्यान, एनसीआरबीने 2023मध्ये देशात एकूण 1,71,418 आत्महत्त्या झाल्याची नोंद केली आहे, जी 2022च्या तुलनेत 0.3% वाढ दर्शवते.

नैराश्याच्या स्थितीत “इथे” तत्काळ संपर्क करा

कुणाच्याही मनात आत्महत्त्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल किंवा भावनिक आधाराची आवश्यकता असेल, तर MANAS सल्लागारांना फोन करा. क्रमांक: 14416 किंवा 18008914416 (टोल फ्री). येथे तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 24 तास समुपदेशक उपलब्ध आहेत.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content