Homeटॉप स्टोरीदर तासाला एक...

दर तासाला एक शेतकरी करतो भारतात आत्महत्त्या!

भारतात दर तासाला एक शेतकरी आत्महत्त्या करत असल्याचे वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातूनच  समोर आले आहे. आत्महत्त्या करणाऱ्यांपैकी सर्वाधिक 38.5% शेतकरी महाराष्ट्रातील असून, त्यानंतर कर्नाटक (22.5%), आंध्र प्रदेश (8.6%), मध्य प्रदेश (7.2%) आणि तामिळनाडू (5.9%) या राज्यांचा क्रमांक लागतो. एकेकाळी समृद्ध कृषी वारशावर भरभराटीला आलेले, परंतु आता नैराश्य आणि यातनांनी व्यापलेले हे प्रदेश आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की, 2023मध्ये, शेती क्षेत्रात काम करणारा किमान एक व्यक्ती दर तासाला आत्महत्त्या करून मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे शेती करणाऱ्या कुटुंबावर असलेल्या वाढत्या आर्थिक ताणावर अधिक प्रकाश पडतो.

आत्महत्त्यांपैकी 43% शेतकरी, उर्वरित शेतमजूर

2023मध्ये, शेती क्षेत्रात गुंतलेल्या एकूण 10,786 व्यक्तींचा मृत्यू झाला, जो देशातील एकूण 1,71,418 आत्महत्त्याग्रस्तांपैकी 6.3% होता. तथापि, मागील वर्षाच्या, 2022च्या तुलनेत आत्महत्त्यांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. परंतु तीव्रता आणि कारणे तीच राहिली आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की, एकूण आत्महत्त्यांपैकी 43% शेतकरी आहेत, तर उर्वरित शेतमजूर आहेत. एकूण 4,690 शेतकरी आणि 6,096 शेतमजूरांनी आत्महत्त्या केल्या. आत्महत्त्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 4,553 पुरुष आणि 137 महिला होत्या.

पश्चिम बंगाल, ईशान्येसह काही राज्यं आत्महत्त्यामुक्त

दुसरीकडे, काही प्रमुख राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये आत्महत्त्येचे प्रमाण शून्य झाल्याचे अहवालातून दिसत आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली आणि लक्षद्वीप राज्यांनी ही किमया साधली आहे. 2022मध्ये, उत्तराखंडमध्ये आत्महत्त्यांची संख्या शून्य होती, परंतु 2023मध्ये, तिथे आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली. तथापि, यावर्षी झारखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकही आत्महत्त्या नोंदवली गेली नाही, तर गेल्या वर्षी, त्यात वाढ झाली होती.

देशातील एकूण आत्महत्त्यांमध्ये वाढ

2022मध्ये, शेती क्षेत्रातील आत्महत्त्यांची संख्या तुलनेने जास्त होती. त्यावर्षी शेतीशी संबंधित एकूण 11,290 व्यक्तींनी आत्महत्त्या केल्या. त्यात 5,207 शेतकरी आणि 6,063 शेतमजूर होते. एकूण 5,207 शेतकरी आत्महत्त्यांपैकी एकूण 4,999 पुरुष आणि 208 महिला होत्या. त्याचप्रमाणे, 2022मध्ये शेती कामगारांनी केलेल्या 6,083 आत्महत्त्यांपैकी 5,472 पुरुष आणि 611 महिला होत्या. दरम्यान, एनसीआरबीने 2023मध्ये देशात एकूण 1,71,418 आत्महत्त्या झाल्याची नोंद केली आहे, जी 2022च्या तुलनेत 0.3% वाढ दर्शवते.

नैराश्याच्या स्थितीत “इथे” तत्काळ संपर्क करा

कुणाच्याही मनात आत्महत्त्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल किंवा भावनिक आधाराची आवश्यकता असेल, तर MANAS सल्लागारांना फोन करा. क्रमांक: 14416 किंवा 18008914416 (टोल फ्री). येथे तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 24 तास समुपदेशक उपलब्ध आहेत.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content