Homeकल्चर +साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे...

साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न!

साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे विरार येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह येथे नुकताच एकपात्री अभिनय स्पर्धा आणि महाराष्ट्रातील साहित्य आणि कला क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत साहित्यिक आणि कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी वय वर्षे ६ ते १५ आणि १६ व त्यावरील अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटनप्रसंगी संपादक आणि लेखक उमाकांत वाघ, तानसा ग्लोबल स्कुल चे उपाध्यक्ष तुकाराम पष्ठे -प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील-कोल्हापूर, साहित्यिक सचिन कुसनाळे-सांगली, संगीतकार -मिलींद वाणी-डोंबिवली, आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा-माहूर, नाट्य-सिने अभिनेता शिवाजी शिंदे-कल्याण, नाट्य अभिनेता रमेश मुनेश्वर-नांदेड, रांगोळीकार मच्छिंद्र वैती-विरार पालघर उपस्थित होते.

यावेळी कला व साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा मान्यवरांना राज्यस्तरिय साथी साहित्यभूषण व कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात नाट्य अभिनेता-दिग्दर्शक रमेश मुनेश्वर-नांदेड, आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा-माहूर, सिना-नाट्य अभिनेता शिवाजी शिंदे-कल्याण ठाणे,  सिने संगीतकार,तबला वादक-मिलींद वाणी-डोंबिवली,  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक साहित्यिक  डॉ. श्रीकांत पाटील-कोल्हापूर, शोध साहित्यिक सचिन कुसनाळे- सांगली, प्रा.डॉ. महेंद्रकुमार पगारे मराठी विभाग प्रमुख उमवी-जळगाव, संत साहित्यिक प्रा. संपत गर्जे-पुणे, प्रसिध्द रांगोळीकार मच्छिंद्र वैती-विरार पालघर तसेच साहित्यासाठी कार्य करणाऱ्या वृत्तपत्रासाठीचा “साथी साहित्य मित्र” पुरस्कार संपादक उमाकांत वाघ विरार यांना संन्मानित करण्यात आले.  एकपात्री अभिनय स्पर्धेत ५ वर्षापासून ७६ वर्षापर्यंतच्या स्पर्धक कलाकावंतानी आपली कला सादर करुन उपस्थिताःची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोतारणे, नेहा धारुळकर आणि डॉ अनुपमा जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साथी परिवाराचे अध्यक्ष नटराज मोरे, सचीव सौ. अनुराधा धामोडे, नाट्य विभाग प्रमुख नाट्य टि.व्ही.चित्रपट अभिनेता-दिग्दशॆक निर्माता भरत जगताप, सहसचिव विजय जोगमार्गे,  कोकण विभाग अध्यक्ष अडॅ. नेहा धारुळकर, सल्लागार डॉ. अनुपमा जाधव, योगेश गोतारणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content