Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या के पूर्व...

मुंबईतल्या के पूर्व आणि जी उत्तर भागाला आज पाणी नाही!

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे मुंबईतल्या ‘के पूर्व’ आणि ‘जी उत्तर’ विभागात आज पाणीपुरवठा होणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही गळती दुरुस्त करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

पाणी

आज दि. ०८ एप्रिल २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा जलवाहिनीवर दुपारी ३.३०च्या सुमारास पवई येथे आकस्मिकरित्या मोठी पाणीगळती सुरू झाली आहे. ही गळती दुरुस्तीच्या कामासाठी तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून सदर दुरुस्ती काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी जल अभियंता खात्यास अपेक्षा आहे.

आकस्मिकरित्या उद्भवलेल्या या गळतीमुळे सध्या सुरू असलेला ‘के पूर्व’ विभागाचा पाणीपुरवठा आणि संध्याकाळी होणारा ‘जी उत्तर’ विभागाचा (धारावी) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. संबंधितांनी याची नोंद घेऊन असलेले पाणी जपून, काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content