Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या के पूर्व...

मुंबईतल्या के पूर्व आणि जी उत्तर भागाला आज पाणी नाही!

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे मुंबईतल्या ‘के पूर्व’ आणि ‘जी उत्तर’ विभागात आज पाणीपुरवठा होणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही गळती दुरुस्त करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

पाणी

आज दि. ०८ एप्रिल २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा जलवाहिनीवर दुपारी ३.३०च्या सुमारास पवई येथे आकस्मिकरित्या मोठी पाणीगळती सुरू झाली आहे. ही गळती दुरुस्तीच्या कामासाठी तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून सदर दुरुस्ती काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी जल अभियंता खात्यास अपेक्षा आहे.

आकस्मिकरित्या उद्भवलेल्या या गळतीमुळे सध्या सुरू असलेला ‘के पूर्व’ विभागाचा पाणीपुरवठा आणि संध्याकाळी होणारा ‘जी उत्तर’ विभागाचा (धारावी) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. संबंधितांनी याची नोंद घेऊन असलेले पाणी जपून, काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content