Homeहेल्थ इज वेल्थसध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या...

सध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंधांपासून मुक्त!

कोरोनाविषयक कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याची आवश्यकता आजमितीला नाही, असे राज्य सरकारने आज स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून आतंरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची थर्मल चाचणी केली जाणार आहे.

सहव्याधी असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक घेऊन करोनाविषयक केंद्र सरकारचे निर्देश आणि सद्यस्थिती यांचा आढावा घेतला. 

बीएफ.७ या करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या प्रकाराचे देशात केवळ चार रुग्ण असून दोन गुजरात तर दोन रुग्ण ओरिसात आढळलेले आहेत. महाराष्ट्रात त्याचा एकही रुग्ण नाही. तरीही पूर्वकाळजी म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक विशेषतः सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक यांना सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान करण्याचे आवाहन करत आहोत. कारण तसे करणे सार्वजनिक हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोना

यानंतरच्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. महाराष्ट्राच्या जनतेने काळजी न करता कोरोनाबद्दल सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले. मागील आठवड्यात राज्यातली कोविड रुग्णसंख्या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. कोविड चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण सध्या .29 इतके आहे. संसर्ग होऊन रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत आहे. मागच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात फक्त 16 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. 22 डिसेंबरच्या म्हणजेच आजच्या अहवालानुसार राज्यात एकूण 134 क्रियाशील रुग्ण आहेत. मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशात उफाळून आलेला कोरोना लक्षात घेता सावधानता बाळगण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत असे ते म्हणाले.

भीती नको पण काळजी घ्या, मास्कसक्ती नाही पण वरिष्ठ नागरिक आणि अति जोखमीचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोविडअनुरूप वर्तणूक या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रयोगशाळेत चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा. आयटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात यावा. शंभर टक्के जनुकीय क्रम निर्धारण तपासणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि प्रिकॉशन डोस यावर भर देण्यात यावा. रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी. मनुष्यबळ प्रशिक्षण तसेच क्षमता तयार करावी. आंतरराष्ट्रीय प्रवासांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. राज्य टास्क फोर्स स्थापन करावा असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content