Homeपब्लिक फिगरनितीन गडकरींनी आतापर्यंत...

नितीन गडकरींनी आतापर्यंत दिला ४० हजार दिव्यांगाना मदतीचा हात

आपल्या महाराष्ट्रभूमीला साहित्य, संस्कृती आणि इतिहासाची मोठी देणगी आहे, अनेक संतांनी आपल्या वचनांमधून समाजातल्या वंचितांची सेवा करण्याचा संदेश दिला आहे. त्याच वचनांनुसार गेली कित्येक वर्ष आपणदेखील सामाजिक कार्यात सक्रिय असून नुकतंच आपण ४० हजार दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप केलं. तसेच ज्यांना पाय नाहीत त्यांना कृत्रिम पाय देण्याचा उपक्रम राबवत आहोत. शोषित आणि पीडित व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

सूर्योदय प्रतिष्ठानतर्फे आयोजित गिफ्टिंग ऑफ साऊंड या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आज मुंबईत कर्णबधीर व्यक्तींना श्रवणयंत्र देण्याचा उपक्रम झाला, त्यावेळी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जन्मतः व्यंग असणाऱ्या किंवा काही आजारपणामुळे किंवा अपघातामुळे दिव्यांग झालेल्या निराधार व्यक्तींना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सहाय्य करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख गडकरी यांनी केला.

तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण लोकांचं जीवन बदलू शकतो. शोषित आणि पीडित व्यक्तींना सन्मानाने जीवन जगता यावं, त्यांना एक नवीन जीवन मिळावं यासाठी सातत्याने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे गडकरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला गायिका अनुराधा पौडवाल आणि संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content