Homeचिट चॅटयुवा अॅथलेटिक्स स्पर्धेत...

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४८०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्स, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, टीजेएसबी बँक हे स्पर्धेचे प्रायोजक होते.

ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षांखालील मुलामुलींच्या गटात संपन्न झाली. ओंकार इंग्लिश मीडियम स्कूल, होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, सेंट जॉन बॉस्को हायस्कूल, भारतीय सैनिक विद्यालय आणि सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या शाळांच्या खेळाडूंनीदेखील या स्पर्धेत चमक दाखवली.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून चैतन्य साळवे आणि अर्णव साबळे यांची निवड झाली, तर १४ वर्षाखालील मुलींच्या गटात अॅना एन आणि आरोही नलावडे यांनी हा मान मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम शेट्टी, ध्रुव शिरोडकर आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मिहिका सुर्वे आणि रिद्धी माने यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात समर्थ भिंगारदेवे, आयुष पाटील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटात लावण्या बांगर यांनी सर्वोत्तम धावपटूंचा मान मिळवला. गोळाफेकमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात राज प्रजापती, १७ वर्षांंखालील मुलांच्या गटात खुशाल तिवारी आणि १९ वर्षांखालील मुलांच्या गटात स्टॅनिस क्वाड्रोस यांनी सुवर्णपदके जिंकली. १४ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत ऋतुजा वारदेकर आणि १७ वर्षांखालील गटात नव्या चकूरकर यांनी पहिला क्रमांक मिळवला.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content