Homeचिट चॅटयुवा अॅथलेटिक्स स्पर्धेत...

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४८०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्स, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, टीजेएसबी बँक हे स्पर्धेचे प्रायोजक होते.

ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षांखालील मुलामुलींच्या गटात संपन्न झाली. ओंकार इंग्लिश मीडियम स्कूल, होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, सेंट जॉन बॉस्को हायस्कूल, भारतीय सैनिक विद्यालय आणि सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या शाळांच्या खेळाडूंनीदेखील या स्पर्धेत चमक दाखवली.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून चैतन्य साळवे आणि अर्णव साबळे यांची निवड झाली, तर १४ वर्षाखालील मुलींच्या गटात अॅना एन आणि आरोही नलावडे यांनी हा मान मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम शेट्टी, ध्रुव शिरोडकर आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मिहिका सुर्वे आणि रिद्धी माने यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात समर्थ भिंगारदेवे, आयुष पाटील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटात लावण्या बांगर यांनी सर्वोत्तम धावपटूंचा मान मिळवला. गोळाफेकमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात राज प्रजापती, १७ वर्षांंखालील मुलांच्या गटात खुशाल तिवारी आणि १९ वर्षांखालील मुलांच्या गटात स्टॅनिस क्वाड्रोस यांनी सुवर्णपदके जिंकली. १४ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत ऋतुजा वारदेकर आणि १७ वर्षांखालील गटात नव्या चकूरकर यांनी पहिला क्रमांक मिळवला.

Continue reading

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून...
Skip to content