Homeएनसर्कलकान्स महोत्सवात नेहा...

कान्स महोत्सवात नेहा पेंडसेंच्या गळ्यात पेठेंचा पन्ना हार

भारतातील परंपरासंपन्न दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी २०२५च्या कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या दागिन्यांच्या राजेशाही तेजाने जागतिक स्तरावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिने त्यांच्या खास ब्रायडल कलेक्शनमधील पोल्की आणि पन्ना हार परिधान करून रेड कार्पेटवर प्रवेश केला आणि भारतीय पारंपरिक कारागिरी व कालातीत सौंदर्यशास्त्राने उपस्थितांचे मन जिंकले.

नेहाच्या सौंदर्याला साजेसा असा हा हार कुशल कारागिरांनी तयार केला असून तो शाही वारशाची प्रेरणा आणि निसर्गदत्त पन्न्यांच्या ताजेपणाचा संगम दर्शवतो. पारंपरिक पोल्कीच्या मोठ्या सेटिंग्ज आणि हिरव्या पन्नाचे देखणे रंग तिच्या आधुनिक पोशाखाला एक अनोखा क्लासिक टच देत होते. हा हार तिच्या लूकला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आणि भारतीय कलाकुसरीला रेड कार्पेटवर ग्लोबल स्पॉटलाइटमध्ये आणून ठेवले. ११५ वर्षांहून अधिक काळ स्त्रियांच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला दागिन्यांच्या माध्यमातून साजरे करणाऱ्या पेठे ज्वेलर्सनी या ऐतिहासिक क्षणाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय दागिन्यांच्या सौंदर्याची आणि परंपरेची साक्ष दिली.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content