Homeकल्चर +मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट...

मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ मार्चपासून!

येत्या १४ ते १८ मार्च दरम्यान ‘मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.

मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष कमांडर शांगप्लियांग यांनी नुकतीच याची घोषणा केली. मेघालय अतिशय निसर्गसुंदर, शांतपूर्ण आणि अनेक रमणीय स्थळे असलेला प्रदेश आहे. कोलकाता, दिल्लीवरून शिलाँगसाठी थेट फ्लाईटही आहेत. इथले चित्रपटकर्मी तिथे चित्रिकरणासाठी आले तर त्यांना मेघालय सरकारकडून सहकार्य मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मेघालयमध्ये पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६५हून अधिक चित्रपट आणि लघुपटही दाखवण्यात येणार आहेत. मेघालय चित्रपट धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही कमांडर शांगप्लियांग यांनी यावेळी सांगितले.

डॉ. हरजीत सिंह आनंद (इंडो युरोपियन बिझनेस कौन्सिल चेम्बर ऑफ कॉमर्सचे संस्थापक), आयपीएस अधिकारी मोहन राठोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात महोत्सवाचा लोगो आणि अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंकज बेरी, मानव सोहल, श्रावणी गोस्वामी, ब्राइट आऊटडोअर मीडिया लिमिटेडचे योगेश लखानी, अर्चना जैन, एकता जैन, शिवम मिश्रा, सेलेब्रिटी ॲस्ट्रॉलॉजर नरेंद्र शास्त्री उपस्थित होते. एबीके मीडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक संचालिका अरुणा चक्रवर्ती यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले.

Continue reading

मिसिंग लिंकवर सेल्फी काढाल तर पावती फाटेल मोठ्या दंडाची!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रूतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून अशाप्रकारे वाहन थांबवणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे...

आधार कार्डाचे स्वरूप आहे तसेच राहणार!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) देण्यात येत असलेल्या आधार कार्डाच्या स्वरूपात कोणत्याही पद्धतीचे बदल करण्यात येणार नाहीत. तसे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आधार कार्डाचे स्वरुप बदलले जाऊ शकते. त्यावर केवळ एक...

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...
Skip to content