Homeपब्लिक फिगरसंजय गांधी राष्ट्रीय...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात टाकले जाते डेब्रिज!

मुंबईचे फुफ्फुस म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील झाडे-झुडपे, हिरवळ नष्ट करत रोज शेकडो ट्रक, टेम्पो इमारतींचे डेब्रिज येथे टाकून पर्यावरणला मोठी हानी पोहोचवत आहेत, असे सांगत मागाठाणे येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या उद्यानातील काजूपाडा, हनुमान नगर येथे ट्रकमधून रोज डेब्रिज टाकण्यात येत असल्याने येथील झाडे नष्ट झाली आहेत. डेब्रिजमुळे येथे मोठे डोंगर झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी आपण झाडे लावा, झाडे जगवा, या उक्तीप्रमाणे पावसाळ्यात सुमारे एक लाख झाडे लावतो आणि भूमाफिया अशाप्रकारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काजूपाडा, हनुमान नगर येथे ट्रक, टेम्पोमधून रोज डेब्रिज टाकतात. त्यामुळे येथील पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे. जर आदिवासी बांधवांनी आणि नागरिकांनी आपल्या घरांची डागडुजी केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येते. मात्र पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री व वन मंत्र्यांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि येथील पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content