Homeमुंबई स्पेशलमनोज सौनिक राज्याचे...

मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव!

राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव येत्या 30 तारखेला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक कार्यभार स्वीकारणार आहेत.

मनोज सौनिक हा कार्यभार स्वीकारताना पुढील आदेश होईपर्यंत आपल्याकडील वित्त विभागाचा कार्यभार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतील. राज्य शासनाने आज याबाबतचे आदेश जारी केले.

सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्तपदी काम केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणून काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

मनू कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त

येत्या 30 तारखेला राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होत असलेले मनू कुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्राचे मुख्य सेवा हक्क आयुक्त या पदावर नेमणूक केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होतील, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत ते या पदावर असतील.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content