Homeचिट चॅटचेंबूरमध्ये रंगला मल्लखांब,...

चेंबूरमध्ये रंगला मल्लखांब, जिमनॅस्टिक्स खेळाडूंचा कौतुकसोहळा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब आणि जिमनॅस्टिक्स खेळात चमकदार कामगिरी करण्याऱ्या, तसेच राष्ट्रीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेतदेखील पदके जिंकण्याऱ्या खेळाडूंचा कौतुक सोहळा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने मुंबईतल्या चेंबूर येथील नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता.

उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकतालिकेत द्वितीय क्रमांक पटकाविला. गेल्या दोन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांप्रमाणे यंदादेखील महाराष्ट्राच्या यशात जिमनॅस्टिक, मल्लखांब खेळाडूंचा मोठा वाटा होता. यंदा महाराष्ट्राने जिमनॅस्टिक्समध्ये ४ सुवर्ण, १ रौप्य, तर मल्लखांब खेळात ४ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली, तसेच सूरत येथे झालेल्या राष्ट्रीय जिमनॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेतदेखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगले यश संपादन केले. या दोन्ही स्पर्धांतील पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

या समारंभास लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, बृहन्मुंबई जिल्हा जिम्नास्टिक संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत राठोड, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी, सेना उबाठाचे चेंबूर विधानसभा विभागप्रमुख प्रमोद शिंदे, मुंबई जिमनॅस्टिक संघटनेचे उपाध्यक्ष शरद भोसले, नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री शिव छत्रपती पुरस्कार तसेच उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त राहुल ससाणे, सुनील रणपिसे, योगेश पवार, सुनील गंगावणे हेदेखील उपस्थित होते. या खेळाडूंच्या कौतुक सोहळ्याच्या आयोजनासाठी बृहन्मुंबई जिल्हा जिमनॅस्टिक संघटना, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना, स्पोर्ट्स अॅक्रोबॅटिक्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र लोकमान्य शिक्षण संस्था, शरद आचार्य क्रीडा केंद्र, सुकहारा स्पोर्ट्स अकॅडमी या सर्वांचेदेखील मोलाचे सहकार्य मिळाले.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content