Homeचिट चॅटचेंबूरमध्ये रंगला मल्लखांब,...

चेंबूरमध्ये रंगला मल्लखांब, जिमनॅस्टिक्स खेळाडूंचा कौतुकसोहळा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब आणि जिमनॅस्टिक्स खेळात चमकदार कामगिरी करण्याऱ्या, तसेच राष्ट्रीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेतदेखील पदके जिंकण्याऱ्या खेळाडूंचा कौतुक सोहळा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने मुंबईतल्या चेंबूर येथील नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता.

उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकतालिकेत द्वितीय क्रमांक पटकाविला. गेल्या दोन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांप्रमाणे यंदादेखील महाराष्ट्राच्या यशात जिमनॅस्टिक, मल्लखांब खेळाडूंचा मोठा वाटा होता. यंदा महाराष्ट्राने जिमनॅस्टिक्समध्ये ४ सुवर्ण, १ रौप्य, तर मल्लखांब खेळात ४ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली, तसेच सूरत येथे झालेल्या राष्ट्रीय जिमनॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेतदेखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगले यश संपादन केले. या दोन्ही स्पर्धांतील पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

या समारंभास लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, बृहन्मुंबई जिल्हा जिम्नास्टिक संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत राठोड, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी, सेना उबाठाचे चेंबूर विधानसभा विभागप्रमुख प्रमोद शिंदे, मुंबई जिमनॅस्टिक संघटनेचे उपाध्यक्ष शरद भोसले, नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री शिव छत्रपती पुरस्कार तसेच उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त राहुल ससाणे, सुनील रणपिसे, योगेश पवार, सुनील गंगावणे हेदेखील उपस्थित होते. या खेळाडूंच्या कौतुक सोहळ्याच्या आयोजनासाठी बृहन्मुंबई जिल्हा जिमनॅस्टिक संघटना, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना, स्पोर्ट्स अॅक्रोबॅटिक्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र लोकमान्य शिक्षण संस्था, शरद आचार्य क्रीडा केंद्र, सुकहारा स्पोर्ट्स अकॅडमी या सर्वांचेदेखील मोलाचे सहकार्य मिळाले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content