Homeचिट चॅटचेंबूरमध्ये रंगला मल्लखांब,...

चेंबूरमध्ये रंगला मल्लखांब, जिमनॅस्टिक्स खेळाडूंचा कौतुकसोहळा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब आणि जिमनॅस्टिक्स खेळात चमकदार कामगिरी करण्याऱ्या, तसेच राष्ट्रीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेतदेखील पदके जिंकण्याऱ्या खेळाडूंचा कौतुक सोहळा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने मुंबईतल्या चेंबूर येथील नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता.

उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकतालिकेत द्वितीय क्रमांक पटकाविला. गेल्या दोन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांप्रमाणे यंदादेखील महाराष्ट्राच्या यशात जिमनॅस्टिक, मल्लखांब खेळाडूंचा मोठा वाटा होता. यंदा महाराष्ट्राने जिमनॅस्टिक्समध्ये ४ सुवर्ण, १ रौप्य, तर मल्लखांब खेळात ४ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली, तसेच सूरत येथे झालेल्या राष्ट्रीय जिमनॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेतदेखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगले यश संपादन केले. या दोन्ही स्पर्धांतील पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

या समारंभास लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, बृहन्मुंबई जिल्हा जिम्नास्टिक संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत राठोड, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी, सेना उबाठाचे चेंबूर विधानसभा विभागप्रमुख प्रमोद शिंदे, मुंबई जिमनॅस्टिक संघटनेचे उपाध्यक्ष शरद भोसले, नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री शिव छत्रपती पुरस्कार तसेच उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त राहुल ससाणे, सुनील रणपिसे, योगेश पवार, सुनील गंगावणे हेदेखील उपस्थित होते. या खेळाडूंच्या कौतुक सोहळ्याच्या आयोजनासाठी बृहन्मुंबई जिल्हा जिमनॅस्टिक संघटना, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना, स्पोर्ट्स अॅक्रोबॅटिक्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र लोकमान्य शिक्षण संस्था, शरद आचार्य क्रीडा केंद्र, सुकहारा स्पोर्ट्स अकॅडमी या सर्वांचेदेखील मोलाचे सहकार्य मिळाले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content