Homeचिट चॅटमुंबईतील खड्यांविरोधात मकरंद नार्वेकर...

मुंबईतील खड्यांविरोधात मकरंद नार्वेकर आक्रमक

ड्रीम्स सिटी म्हणवणाऱ्या मुंबईमध्ये नुकताच मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अराजकता निर्माण झाली आहे आणि दरवर्षीप्रमाणेच अशा परिस्थितीसाठी महानगरपालिकेच्या तयारीबद्दलची चिंता वाढली आहे. अंधेरी, वांद्रे, सांताक्रूझ आणि कुलाबा यासारख्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यातच खड्ड्यांमुळे येथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या आव्हानांमध्ये भर पडली आहे, असे मत व्यक्त करत माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईतल्या खड्ड्यांविरूद्ध आवाज उठविला आहे.

नार्वेकर आपली चिंता व्यक्त करताना म्हणाले की, पावसाळ्यात, आम्ही रस्त्यावर असंख्य जीवघेणे अपघात पाहिले आहेत. विशेषत: मोठ्या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करणार्‍या दुचाकीस्वारांचा समावेश आहे. त्यासाठी आम्ही आधीपासूनच रस्त्यावर उतरलो आहोत. मुंबई महानगरपालिका रस्त्यांच्या देखभालीसाठी दरवर्षी सुमारे २ हजार कोटींची तरतूद करते. मात्र, धोकादायक खड्डे कायम असून, दीर्घकाळापर्यंत पाणी साचून ड्रेनेजव्यवस्था बिघडली आहे.

नार्वेकर यांचे ट्विटही व्हायरल झाले आहे. त्यात असे म्हटले आहे की, पावसाळ्याच्या अवघ्या तीन दिवसांत महानगरपालिकेकडे खड्ड्यांच्या तब्बल १०३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत! म्हणूनच, मे महिन्यापासून मी अथकपणे माझ्या समस्या मांडत आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content