Homeपब्लिक फिगरविधानसभेत मविआने मुस्लिमांना...

विधानसभेत मविआने मुस्लिमांना किमान 20-25 जागा द्याव्या!

महाराष्ट्रात विधानसभेचे 40 मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत, जेथून मुस्लिम उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मुस्लिमांची संख्या ११.५% आहे हे लक्षात घेऊन 29 ते 30 जागा मुस्लिम समाजाला मिळाल्या पाहिजेत. परंतु मी इतक्या जागा मिळाव्या अशी मागणी करणार नाही. मात्र किमान 20 ते 25 जागांवर मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी तसा विचार केला पाहिजे. यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर काल झालेल्या दिल्ली भेटीत केली.

मुस्लिम

दलवाई यांनी खर्गे यांच्याबरोबर झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्वापासून डावलण्यात येत असल्याची तक्रार केली. विधान परिषदेची जागा महाराष्ट्रातील काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्याला मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु ऐनवेळेला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना  उमेदवारी देण्यात आली. त्याबद्दल आमची तक्रार नाही त्यांना विधान परिषदेचा संपूर्ण कालावधी मिळाला नव्हता हे खरेच आहे. त्याचबरोबर त्या काँग्रेसची अतिशय महत्त्वाची जबाबदारी लीलया पेलणाऱ्या दिवंगतराजीव सातव यांच्या पत्नीही आहेत. त्यामुळे मी याबद्दल तक्रार करणार नाही. परंतु महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

खर्गे यांनी आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ही गोष्ट योग्य असून याचा नक्की विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही दलवाई यांनी दिली.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content