Homeपब्लिक फिगरविधानसभेत मविआने मुस्लिमांना...

विधानसभेत मविआने मुस्लिमांना किमान 20-25 जागा द्याव्या!

महाराष्ट्रात विधानसभेचे 40 मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत, जेथून मुस्लिम उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मुस्लिमांची संख्या ११.५% आहे हे लक्षात घेऊन 29 ते 30 जागा मुस्लिम समाजाला मिळाल्या पाहिजेत. परंतु मी इतक्या जागा मिळाव्या अशी मागणी करणार नाही. मात्र किमान 20 ते 25 जागांवर मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी तसा विचार केला पाहिजे. यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर काल झालेल्या दिल्ली भेटीत केली.

मुस्लिम

दलवाई यांनी खर्गे यांच्याबरोबर झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्वापासून डावलण्यात येत असल्याची तक्रार केली. विधान परिषदेची जागा महाराष्ट्रातील काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्याला मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु ऐनवेळेला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना  उमेदवारी देण्यात आली. त्याबद्दल आमची तक्रार नाही त्यांना विधान परिषदेचा संपूर्ण कालावधी मिळाला नव्हता हे खरेच आहे. त्याचबरोबर त्या काँग्रेसची अतिशय महत्त्वाची जबाबदारी लीलया पेलणाऱ्या दिवंगतराजीव सातव यांच्या पत्नीही आहेत. त्यामुळे मी याबद्दल तक्रार करणार नाही. परंतु महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

खर्गे यांनी आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ही गोष्ट योग्य असून याचा नक्की विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही दलवाई यांनी दिली.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content