Homeकल्चर +क्रियेशन कराओके क्लबच्या...

क्रियेशन कराओके क्लबच्या स्पर्धेत माधवी पाटील विजेत्या!

क्रियेशन कराओके क्लबच्या वतीने मुंबईत गोरेगावच्या प्रज्ञाबोधिनी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कराओके गायन स्पर्धेत माधवी पाटील यांनी पहिले पारितोषिक पटकावले. रेश्मा धोत्रे यांना दुसरे तर पूर्वा पाठक यांना तिसरे बक्षिस मिळाले. कमल जोशी तसेच स्वाती परब यांना चौथे उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून देण्यात आले.

या स्पर्धेच्या वेळी साधारण १२५ लोक उपस्थित होते. त्यापैकी ६२ जणांनी स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेसाठी काही नियम निश्चित करण्यात आले होते. यामध्ये गायकांचा क्रम सोडतीने ठरवला गेला होता. स्टेजवर गेल्यावर गायक त्याचे नाव आणि क्रमांक माईकवरून समोर बसलेल्या परीक्षकांना सांगायचा. गायक गाण्याचे बोल माईकवरून सांगायचा आणि त्याप्रमाणे समोरील मॉनिटरवर तो कराओके ट्रॅक यायचा. गायकाने गाण्याचा मुखडा आणि दोन अंतरे गायचे. त्यानंतर ट्रॅक बंद करण्यात यायचा. परीक्षक सूर, ताल, लय, भाव आणि सादरीकरण यांना अनुक्रमे १० गुणांपैकी गुण द्यायचे. अशी एकंदर ५० गुणांची ही स्पर्धा होती. भूषण सामंत, पंडित युधामन्यू गद्रे आणि गोपाळ सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी याकरीता सलग पाच ते साडेपाच तास काम पाहिले.

कराओके

प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माधवी पाटील यांचं गाणं ऐकल्यानंतर परीक्षक काय निर्णय देतील तो निर्णय आधीच तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी लावला होता आणि सर्वांनीच पहिला क्रमांक ठरवूनही टाकला होता. कारण, त्यांचं गाणंच तसं झालं होतं. माधवींची मेहनत अफलातून तर होतीच, गाणं त्याहून सुंदर होतं आणि मुख्य म्हणजे ते गाणं गायला फार कठीण होतं.

कराओके

रेश्मा धोत्रे यांचं गाणं तर काही विचारायला नकोच. खूपच छान झालं. त्यांचा क्रमांक दुसरा आला. नियमित हसतमुख असणाऱ्या पूर्वा पाठक यांनी अक्षरशः त्या काळाची आठवण करून दिली. ज्यावेळेस तो सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा सर्वांच्या मुखात ते गाणं कायमच असायचं. त्यांना तिसरे बक्षिस मिळाले. कमल जोशी, स्वाती परब या कराओके क्लबचे सदस्यच आहेत. त्यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.

कराओके

अरविंद परुळेकर यांनी क्रियेशन कराओके क्लब १७ जून २०१३ साली चालू केला. अगदी कोरोना काळातही या क्लबचे कार्य चालूच राहिले. आज दहा वर्षांनंतरही या क्लबचे कार्य जोमाने चालूच आहे.

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content