Homeन्यूज ॲट अ ग्लांसशेअर बाजारात पहिल्या...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न झाल्याचा हा फटका मानला जात आहे. सरकारने अपेक्षित भांडवली गुंतवणुकीपेक्षा वित्तीय तूट नियंत्रित राखण्यावर जोर दिल्यानेही बाजाराची काहीशी निराशा झाली आहे. त्यामुळे सुरूवातीलाच सेन्सेक्स गडगडल्याचे समजते.

रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 87.15 या विक्रमी नीचांकी पातळीपर्यंत झालेली घसरण आणि कमजोर परदेशी संकेत यामुळे भारतीय बाजारात सुरुवातीला घसरण झाली असावी, असे सांगितले जात आहे. अर्थात पहिल्या अर्ध्या तासातच खालच्या पातळीवरून सेन्सेक्स 300 अंशांहून अधिक सुधारून वर आला. बँक निफ्टीही खालच्या पातळीवरून 350 अंश वर आला. निफ्टी मिडकॅप 500 तर स्मॉल कॅप इंडेक्सही खालच्या पातळीवरून 200 अंक सुधारली. निफ्टीमध्येही खालच्या पातळीवरून 75 अंशांची सुधारणा झाली. मात्र, ही रिकव्हरी फार काळ टिकू शकली नाही आणि सर्व निर्देशांक पुन्हा दहाच्या सुमारास दिवसाच्या नव्या नीचांकी पातळीवर आले.

बाजार उघडताच विक्रीचा जोरदार मारा

सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराला लक्षणीय तोटा सहन करावा लागला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला आणि निफ्टी 50 निर्देशांक 23,250च्या खाली घसरला. सेन्सेक्स शनिवारच्या 77,505.96 च्या आधीच्या क्लोजिंगविरुद्ध 700 अंकांनी घसरून 76,791.09च्या पातळीवर गेला. निफ्टी 50 त्याच्या मागील 23,482.15च्या बंदच्या तुलनेत 23,319.35वर उघडला आणि एक टक्क्याने घसरून 23,246.55वर आला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक घसरल्याने मिड आणि स्मॉल कॅप विभागांमध्ये विक्रीचा जोर वाढला. सकाळी 9:20च्या सुमारास, सेन्सेक्स 671 अंक किंवा 0.87 टक्क्यांनी घसरून 76,835वर आणि निफ्टी 50 219 अंकांनी किंवा 0.93 टक्क्यांनी घसरून 23,263वर होता. BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ₹ 424 लाख कोटींवरून जवळपास ₹ 419 लाख कोटींवर घसरले. ज्यामुळे गुंतवणूकदारांना 5 मिनिटांत सुमारे ₹ 5 लाख कोटींचे नुकसान झाले.

Continue reading

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...
Skip to content