Homeन्यूज ॲट अ ग्लांसशेअर बाजारात पहिल्या...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न झाल्याचा हा फटका मानला जात आहे. सरकारने अपेक्षित भांडवली गुंतवणुकीपेक्षा वित्तीय तूट नियंत्रित राखण्यावर जोर दिल्यानेही बाजाराची काहीशी निराशा झाली आहे. त्यामुळे सुरूवातीलाच सेन्सेक्स गडगडल्याचे समजते.

रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 87.15 या विक्रमी नीचांकी पातळीपर्यंत झालेली घसरण आणि कमजोर परदेशी संकेत यामुळे भारतीय बाजारात सुरुवातीला घसरण झाली असावी, असे सांगितले जात आहे. अर्थात पहिल्या अर्ध्या तासातच खालच्या पातळीवरून सेन्सेक्स 300 अंशांहून अधिक सुधारून वर आला. बँक निफ्टीही खालच्या पातळीवरून 350 अंश वर आला. निफ्टी मिडकॅप 500 तर स्मॉल कॅप इंडेक्सही खालच्या पातळीवरून 200 अंक सुधारली. निफ्टीमध्येही खालच्या पातळीवरून 75 अंशांची सुधारणा झाली. मात्र, ही रिकव्हरी फार काळ टिकू शकली नाही आणि सर्व निर्देशांक पुन्हा दहाच्या सुमारास दिवसाच्या नव्या नीचांकी पातळीवर आले.

बाजार उघडताच विक्रीचा जोरदार मारा

सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराला लक्षणीय तोटा सहन करावा लागला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला आणि निफ्टी 50 निर्देशांक 23,250च्या खाली घसरला. सेन्सेक्स शनिवारच्या 77,505.96 च्या आधीच्या क्लोजिंगविरुद्ध 700 अंकांनी घसरून 76,791.09च्या पातळीवर गेला. निफ्टी 50 त्याच्या मागील 23,482.15च्या बंदच्या तुलनेत 23,319.35वर उघडला आणि एक टक्क्याने घसरून 23,246.55वर आला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक घसरल्याने मिड आणि स्मॉल कॅप विभागांमध्ये विक्रीचा जोर वाढला. सकाळी 9:20च्या सुमारास, सेन्सेक्स 671 अंक किंवा 0.87 टक्क्यांनी घसरून 76,835वर आणि निफ्टी 50 219 अंकांनी किंवा 0.93 टक्क्यांनी घसरून 23,263वर होता. BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ₹ 424 लाख कोटींवरून जवळपास ₹ 419 लाख कोटींवर घसरले. ज्यामुळे गुंतवणूकदारांना 5 मिनिटांत सुमारे ₹ 5 लाख कोटींचे नुकसान झाले.

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content