Homeपब्लिक फिगरमाझ्यावरील आरोपांचा तपास...

माझ्यावरील आरोपांचा तपास एनआयएकडे द्या!

माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊदशी संबंधित असून या प्रकरणात युवा सेना प्रमुख या महिलेला पाठीशी घालत आहेत. या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात यावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

आज दुपारी नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी कामिनी शेवाळे, एड. चित्रा साळुंखे उपस्थित होत्या.

माझ्या विरोधात तक्रार करणारी महिला पाकिस्तान आणि डी गँगशी संबंधित असल्याची आपली माहिती आहे. दुबई पोलिसांचीही माहिती आहे. सदर महिला व्यावसायिक तक्रारदार असून ती आणि तिचे संपूर्ण कुटूंब वादग्रस्त आहे. त्यांच्यावर याधीही अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल आहेत. सदर महिलेने मला, माझ्या पत्नीला आणि माझ्या कुटुंबियांना दोन वर्षांपासून धमकावले. कोविड काळात मी केलेल्या मदतीचा गैरफायदा घेऊन माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या प्रकरणी अंधेरी न्यायालयाने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सदर महिलेच्या विरोधात माझ्या पत्नीने गोवंडी पोलीसठाण्यातदेखील तक्रार दाखल केली आहे. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत, असेही ते म्हणाले.

अशा या महिलेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महिलेला सार्वजनिकरित्या व्यासपीठावर आणले गेले, हीच गंभीर बाब आहे. हे सगळे युवासेना आणि राष्ट्रवादीचे कारस्थान आहे. सदर महिलेच्या सोशल मीडियावरील पोस्ट कोण फॉलो करत आहेत, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. युवासेना यात आधीपासून आघाडीवर होती. त्यांनी घर जोडण्याचा नाही तर माझे घर आणि राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असा दावाही शेवाळे यांनी केला.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content