Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्राला कमी लस...

महाराष्ट्राला कमी लस मिळाल्याचा बाऊ केल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली

लसीकरणासाठी जय्यत तयारीचा दावा करत आम्हाला लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात नाही म्हणून केंद्र सरकारवर दुगाण्या झाडणाऱ्या राज्यातल्या आघाडी सरकारने आतापर्यंत फक्त नऊ लाख लोकांनाच लस देण्यात यश मिळविल्याचे आज अखेर स्पष्ट झाले. समाजमाध्यमाद्वारे जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच ही कबुली दिली.

या लसीमुळे आपल्याला काही साईडइफेक्ट होतील या भीतीने लसीकरण कमी झाल्याची कबुली देताना ही भीती दूर करण्यात सरकार कमी पडले हेही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. त्याचबरोबर कोणतीही भीती न बाळगता बेधडकपणे लस टोचून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडून आम्हाला कमी लसपुरवठा केला जात असल्याचे सांगत ५० लाख लोकांना लस देण्याची तयारी आम्ही केल्याचे म्हटले होते.

अभावानेच प्रत्यक्ष स्थळावर जात कार्यक्रमांना हजर राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उद्यानंतर आपण सर्व शासकीय कार्यक्रम दूरदृष्य प्रणालीमार्फत करणार असल्याचे जाहीर केले. सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम तसेच यात्रांवर काही काळासाठी बंदी घालण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. जनतेला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे तसेच वारंवार हात धुण्याचे आवाहन करून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याबाबतचा निर्णय आपण एका आठवड्यानंतर घेऊ, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आपल्या संबोधनात पुन्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्यावर तसेच केंद्र सरकारवर वाढत्या कोरोनाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. अलीकडे काही जण कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत फिरत आहेत. कोरोना योद्ध्यांचा सत्कार व्हायलाच हवा. पण यानिमित्ताने तुम्ही कोरोना दूत होऊ नका. कोरोना पसरवण्यासाठी कारणीभूत ठरणारे हे सुरू करा, ते उघडा असे सांगू नका, असे ते म्हणाले.

काही जण आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यास सांगत आहेत. चाचण्या जरूर वाढवू, पण नियमांचे पालन करण्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. माझे कुटूंब, माझी जबाबदारी, या मोहिमेप्रमाणे आता मी जबाबदार, अशी मोहीम आपण सुरू करूया, असे ठाकरे म्हणाले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content