Homeकल्चर +बालकुमार साहित्य संमेलनाच्या...

बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लता गुठे!

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने खामगाव येथे घेण्यात येणारे दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका तसेच विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांच्या नावाची घोषणा उज्जैनकर यांनी केली व सर्वांनी लता गुठे यांच्या नावाला एकमताने अनुमोदन केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

गेली वीस वर्ष लता गुठे ह्या साहित्यिका, संपादिका, प्रकाशिका. बाल साहित्यिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही परिचित आहेत. लता गुठे ह्या एम्.ए.बी.एड्. असून त्या संतसाहित्य ते बालसाहित्य अशा विविध विषयावर सातत्याने लिखाण करतात. त्यांची एकूण २० पुस्तकं प्रकाशित आहेत. ‘मोहक युरोप’, ‘जीवनवेल’, ‘मी आहे तिथे’ संत चैतन्याचा मेळा, मना मना दार उघड, ‘पुन्हा नव्याने’, (कवितासंग्रह) शोध अस्तित्त्वाचा (कथासंग्रह), ‘इटुकले पिटुकले’, चांदनबाग, ‘बिन भिंतीची शाळा (बालकथा) काव्य कोडी तसेच मुलांसाठी चेरीलँड नावाचे मासिकाचे संपादनही त्यांनी केले आहे.

गीतलेखन- ‘स्वप्नकळ्या’ व ‘माझं प्रेम’ या ध्वनिमुद्रिकांचीनिर्मिती (ऑडिओ सीडीज), साम मराठी टी.व्ही. वाहिनीवरील ‘रुणुझुणू’ मालिकेला गीतलेखन त्यांनी दिले आहे. भरारी प्रकाशनच्या माध्यमातून २००हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. गेली बारा वर्षं ‘धमाल मस्ती’ व तार्‍यांचे जग या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन व संपादन करत आहेत. विविध महत्त्वाच्या संस्थांचे एकूण ४८ राज्यस्तरीय पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष तसेच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखा कार्यवाह म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content