Homeकल्चर +बालकुमार साहित्य संमेलनाच्या...

बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लता गुठे!

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने खामगाव येथे घेण्यात येणारे दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका तसेच विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांच्या नावाची घोषणा उज्जैनकर यांनी केली व सर्वांनी लता गुठे यांच्या नावाला एकमताने अनुमोदन केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

गेली वीस वर्ष लता गुठे ह्या साहित्यिका, संपादिका, प्रकाशिका. बाल साहित्यिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही परिचित आहेत. लता गुठे ह्या एम्.ए.बी.एड्. असून त्या संतसाहित्य ते बालसाहित्य अशा विविध विषयावर सातत्याने लिखाण करतात. त्यांची एकूण २० पुस्तकं प्रकाशित आहेत. ‘मोहक युरोप’, ‘जीवनवेल’, ‘मी आहे तिथे’ संत चैतन्याचा मेळा, मना मना दार उघड, ‘पुन्हा नव्याने’, (कवितासंग्रह) शोध अस्तित्त्वाचा (कथासंग्रह), ‘इटुकले पिटुकले’, चांदनबाग, ‘बिन भिंतीची शाळा (बालकथा) काव्य कोडी तसेच मुलांसाठी चेरीलँड नावाचे मासिकाचे संपादनही त्यांनी केले आहे.

गीतलेखन- ‘स्वप्नकळ्या’ व ‘माझं प्रेम’ या ध्वनिमुद्रिकांचीनिर्मिती (ऑडिओ सीडीज), साम मराठी टी.व्ही. वाहिनीवरील ‘रुणुझुणू’ मालिकेला गीतलेखन त्यांनी दिले आहे. भरारी प्रकाशनच्या माध्यमातून २००हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. गेली बारा वर्षं ‘धमाल मस्ती’ व तार्‍यांचे जग या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन व संपादन करत आहेत. विविध महत्त्वाच्या संस्थांचे एकूण ४८ राज्यस्तरीय पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष तसेच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखा कार्यवाह म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content