Homeएनसर्कलपाकला लोळवल्यानंतर बारामुल्लातही...

पाकला लोळवल्यानंतर बारामुल्लातही जल्लोष तर लाहोरमध्ये मातम!

दुबईत सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ बाद झाले असून त्यांना त्यांच्या देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. रविवारी भारताबरोबरचा सामना हरल्यानंतरच पाकच्या संघाने सामान बांधले होते. परंतु एक अंधूकशी आशा उराशी बाळगत पाक संघ दुबईत थांबला होता. काल रात्री बांगलादेश आणि न्यूझिलंड संघात सामना होणार होता. हा सामना बांगलादेश जिंकला तर.. पुढे कदाचित आपल्याला संधी मिळू शकेल, असे पाक संघाला वाटले होते. परंतु न्यूझिलंडने बांगलादेशच्या संघाला लोळवले आणि पाकिस्तान व बांगलादेश संघाला हात हलवत घरचा रस्ता धरावा लागला. दरम्यान, रविवारी भारताने पाकिस्तानच्या संघाला लोळवले त्या क्षणी जम्मू आणि काश्मीरमधल्या बारामुल्ला भागात फटाक्यांची आतषबाजी झाली तर पाकिस्तानमध्ये कराचीपासून लाहोरपर्यंत ठिकठिकाणी क्रिकेटप्रेमींनी घरातले टीव्ही फोडले.

विराट कोहलीच्या नाबाद शतकाने भारताने या सामन्यावर विजयाची मोहोर लावली आणि पाकिस्तानच्या अनेक भागात विराटच्या चाहत्यांनी जल्लोष केला. त्याचवेळी विविध माध्यमातून पाकिस्तानचे फॅन्स, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना तसेच पाक क्रिकेट संघाला शिव्यांची लाखोली वाहत होते. रस्त्या-रस्त्यावर शिवीगाळ केली जात होती. पाकिस्तानचा संघ आता परतेल तेव्हा त्याचे सडलेले टोमॅटो आणि अंडी फेकून स्वागत करायला हवे अशी प्रतिक्रिया उमटत होती. पाकिस्तानात सध्या टोमॅटो दोन हजार रुपये किलो दराने विकले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानचा संघ बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग या तिन्ही ठिकाणी कमकुवत ठरला. साधे कॅचही त्यांना पकडता येत नाही. 50 ओव्हरही पूर्ण खेळू शकत नाही. त्यातच पूर्ण संघ बाद होतो. अडीचशे धावांचा टप्पाही ओलांडता येत नाही. कर्णधार रिझवान, शाहिद हे खेळाडू दुबईत फक्त टीआरपी मिळवण्यासाठी आणि फोटो काढून घेण्यासाठी गेले होते, का असे सवाल पाकिस्तान क्रिकेटप्रेमींकडून केले जात होते.

सामना हरल्यानंतर पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक गाण्याच्या ओळी गुणगुणत होता… दिल के अरमान आसूँओ में बह गए.. तर अनेक माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या संघावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. रावलपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा तेज गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तान संघ गेल्या दहा वर्षांपासून सतत हरतोय. यांना जिंकायचं हा शब्दच माहीत नाही. नुसतं गेलं आणि खेळलं म्हणून सामना जिंकता येत नाही. त्यासाठी टॅलेंट दाखवावे लागतात आणि टॅलेंट दाखवण्यासाठी कडी मेहनत करावी लागते. संघातून वगळण्यात आलेला खेळाडू अहमद शहजाद म्हणाला की, पाकिस्तान संघांमध्ये ज्या काही गोष्टी सध्या घडत आहेत त्याने माहोल फार खराब झाला आहे. यासाठी मोठ्या सर्जरीची गरज आहे. वसिम अक्रमनेही पाक संघावर टीकास्त्र डागले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ही ट्रॉफी पाकिस्तान जिंकणार अशी खात्री व्यक्त केली होती. पाकिस्तान जिंकला नाही तर मी नाव बदलून टाकीन, असे ते म्हणाले होते. तो धागा पकडत पाकिस्तानच्या माध्यमातून अनेक समीक्षकांनी, आता पंतप्रधान शरीफ कुठे गेले असा सवाल केला. त्यांनी नाव बदलले का, अशी विचारणाही ते करू लागले. सध्या जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान क्रिकेटमध्ये असतानाच पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर कोणतीही जागतिक स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट संघ जिंकू शकला नाही, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले.

भारतीय संघ रविवारचा पाकविरूद्धचा सामना सामना म्हणूनच खेळले. पाकिस्तानच्या एका फलंदाजाच्या बुटाची लेस सुटली तेव्हा भारतीय खेळाडूने ती बांधताना प्रेक्षकांनी पाहिले. मात्र, पाकिस्तानचे काही खेळाडू जसं भारताविरुद्ध युद्धच लढतोय अशा आविर्भावात वावरत होते. शुभमन गिलला बाद केल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज अबरार अहमद याच्या चेहऱ्यावरचे भाव बघितल्यानंतर पाकिस्तानी संघ हरल्यानंतर रविवारची रात्र पाक क्रिकेटप्रेमींनी कशी काढली असेल याची कल्पनाच केलेली बरी…

बारामुल्ला

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content