Homeएनसर्कलपाकला लोळवल्यानंतर बारामुल्लातही...

पाकला लोळवल्यानंतर बारामुल्लातही जल्लोष तर लाहोरमध्ये मातम!

दुबईत सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ बाद झाले असून त्यांना त्यांच्या देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. रविवारी भारताबरोबरचा सामना हरल्यानंतरच पाकच्या संघाने सामान बांधले होते. परंतु एक अंधूकशी आशा उराशी बाळगत पाक संघ दुबईत थांबला होता. काल रात्री बांगलादेश आणि न्यूझिलंड संघात सामना होणार होता. हा सामना बांगलादेश जिंकला तर.. पुढे कदाचित आपल्याला संधी मिळू शकेल, असे पाक संघाला वाटले होते. परंतु न्यूझिलंडने बांगलादेशच्या संघाला लोळवले आणि पाकिस्तान व बांगलादेश संघाला हात हलवत घरचा रस्ता धरावा लागला. दरम्यान, रविवारी भारताने पाकिस्तानच्या संघाला लोळवले त्या क्षणी जम्मू आणि काश्मीरमधल्या बारामुल्ला भागात फटाक्यांची आतषबाजी झाली तर पाकिस्तानमध्ये कराचीपासून लाहोरपर्यंत ठिकठिकाणी क्रिकेटप्रेमींनी घरातले टीव्ही फोडले.

विराट कोहलीच्या नाबाद शतकाने भारताने या सामन्यावर विजयाची मोहोर लावली आणि पाकिस्तानच्या अनेक भागात विराटच्या चाहत्यांनी जल्लोष केला. त्याचवेळी विविध माध्यमातून पाकिस्तानचे फॅन्स, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना तसेच पाक क्रिकेट संघाला शिव्यांची लाखोली वाहत होते. रस्त्या-रस्त्यावर शिवीगाळ केली जात होती. पाकिस्तानचा संघ आता परतेल तेव्हा त्याचे सडलेले टोमॅटो आणि अंडी फेकून स्वागत करायला हवे अशी प्रतिक्रिया उमटत होती. पाकिस्तानात सध्या टोमॅटो दोन हजार रुपये किलो दराने विकले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानचा संघ बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग या तिन्ही ठिकाणी कमकुवत ठरला. साधे कॅचही त्यांना पकडता येत नाही. 50 ओव्हरही पूर्ण खेळू शकत नाही. त्यातच पूर्ण संघ बाद होतो. अडीचशे धावांचा टप्पाही ओलांडता येत नाही. कर्णधार रिझवान, शाहिद हे खेळाडू दुबईत फक्त टीआरपी मिळवण्यासाठी आणि फोटो काढून घेण्यासाठी गेले होते, का असे सवाल पाकिस्तान क्रिकेटप्रेमींकडून केले जात होते.

सामना हरल्यानंतर पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक गाण्याच्या ओळी गुणगुणत होता… दिल के अरमान आसूँओ में बह गए.. तर अनेक माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या संघावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. रावलपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा तेज गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तान संघ गेल्या दहा वर्षांपासून सतत हरतोय. यांना जिंकायचं हा शब्दच माहीत नाही. नुसतं गेलं आणि खेळलं म्हणून सामना जिंकता येत नाही. त्यासाठी टॅलेंट दाखवावे लागतात आणि टॅलेंट दाखवण्यासाठी कडी मेहनत करावी लागते. संघातून वगळण्यात आलेला खेळाडू अहमद शहजाद म्हणाला की, पाकिस्तान संघांमध्ये ज्या काही गोष्टी सध्या घडत आहेत त्याने माहोल फार खराब झाला आहे. यासाठी मोठ्या सर्जरीची गरज आहे. वसिम अक्रमनेही पाक संघावर टीकास्त्र डागले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ही ट्रॉफी पाकिस्तान जिंकणार अशी खात्री व्यक्त केली होती. पाकिस्तान जिंकला नाही तर मी नाव बदलून टाकीन, असे ते म्हणाले होते. तो धागा पकडत पाकिस्तानच्या माध्यमातून अनेक समीक्षकांनी, आता पंतप्रधान शरीफ कुठे गेले असा सवाल केला. त्यांनी नाव बदलले का, अशी विचारणाही ते करू लागले. सध्या जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान क्रिकेटमध्ये असतानाच पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर कोणतीही जागतिक स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट संघ जिंकू शकला नाही, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले.

भारतीय संघ रविवारचा पाकविरूद्धचा सामना सामना म्हणूनच खेळले. पाकिस्तानच्या एका फलंदाजाच्या बुटाची लेस सुटली तेव्हा भारतीय खेळाडूने ती बांधताना प्रेक्षकांनी पाहिले. मात्र, पाकिस्तानचे काही खेळाडू जसं भारताविरुद्ध युद्धच लढतोय अशा आविर्भावात वावरत होते. शुभमन गिलला बाद केल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज अबरार अहमद याच्या चेहऱ्यावरचे भाव बघितल्यानंतर पाकिस्तानी संघ हरल्यानंतर रविवारची रात्र पाक क्रिकेटप्रेमींनी कशी काढली असेल याची कल्पनाच केलेली बरी…

बारामुल्ला

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content