Homeपब्लिक फिगरते जिंकले वा...

ते जिंकले वा हरले तरी काही फरक पडत नाही!

ते जिंकले किंवा हरले तरी काही फरक पडत नाही, पण खेळामध्ये निरोगी स्पर्धा असली पाहिजे आणि खेळाडूंनी इतर संघांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात ड्युरंड चषक स्पर्धेच्या 2024च्या चषकांचे अनावरण केले. अनावरण केलेल्या करंडकांमध्ये ड्युरंड चषक, राष्ट्रपती चषक आणि शिमला चषक यांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रपतींनी ड्युरंड चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

काहीवेळा खेळामध्ये भावनांचा आवेग असतो. परंतु खेळाडूंनी त्यांच्या भावनांना योग्यरित्या समायोजित करण्यासाठी आणि खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सर्व खेळाडू जिद्दीने आणि खिलाडू वृत्तीने खेळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. व्यावसायिक फुटबॉलपटू जेव्हा हजारो चाहत्यांसमोर खेळतात तेव्हा खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह कैक पटींनी वाढतो, असेही त्या म्हणाल्या. भारतातील फुटबॉलचा स्तर उंचावण्यासाठी सर्व फुटबॉलप्रेमींनी प्रयत्न करावे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.

भारतातली राष्ट्रीय स्तरावरील एक प्रसिद्ध आणि नामांकित फुटबॉल स्पर्धा म्हणून ड्युरंड चषक स्पर्धेला ओळखले जाते. १८८८ सालापासून ही स्पर्धा सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे पहिली ड्युरंड चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content