Homeटॉप स्टोरीमनसे महायुतीच्या वाटेवर?

मनसे महायुतीच्या वाटेवर?

मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची तासभर एकांतात चर्चा केल्यानंतर मनसे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महायुतीत लवकरच सहभागी होण्याची शक्यता वाढल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरचेवर भेटी घेत आहेत. राज ठाकरे यांनी अलीकडेच हिंदुत्वाची कास धरली आहे. मात्र, त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाचा मुद्दाही सोडलेला नाही. भाजपाला मनसेचा हाच मराठी माणसाचा मुद्दा खटकत आहे. परंतु लोकसभेत चारशे पारचा नारा प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर मनसेशी जुळवून घ्यावे लागेल, या निष्कर्षापर्यंत भाजपाचे नेते आले आहेत.

मनसे

नवी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या सत्रात दिल्लीतल्या भाजपा नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी याच अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर लगेचच आज शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याचे बोलले जाते. लोकसभेत मनसेचा पाठिंबा घ्यायचा आणि त्या मोबदल्यात महायुतीतल्या घटक पक्षाला जिंकणे अशक्य असलेल्या जागा सोडाव्यात किंवा त्या बदल्यात विधानसभेसाठी जास्त जागा द्याव्यात असा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु यात या विषयावर कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही. शेलार यांनीही नंतर माध्यमांशी बोलताना या चर्चेबद्दल योग्य वेळी योग्य ती माहिती दिली जाईल, असे सांगितले.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content