Homeटॉप स्टोरीमनसे महायुतीच्या वाटेवर?

मनसे महायुतीच्या वाटेवर?

मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची तासभर एकांतात चर्चा केल्यानंतर मनसे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महायुतीत लवकरच सहभागी होण्याची शक्यता वाढल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरचेवर भेटी घेत आहेत. राज ठाकरे यांनी अलीकडेच हिंदुत्वाची कास धरली आहे. मात्र, त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाचा मुद्दाही सोडलेला नाही. भाजपाला मनसेचा हाच मराठी माणसाचा मुद्दा खटकत आहे. परंतु लोकसभेत चारशे पारचा नारा प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर मनसेशी जुळवून घ्यावे लागेल, या निष्कर्षापर्यंत भाजपाचे नेते आले आहेत.

मनसे

नवी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या सत्रात दिल्लीतल्या भाजपा नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी याच अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर लगेचच आज शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याचे बोलले जाते. लोकसभेत मनसेचा पाठिंबा घ्यायचा आणि त्या मोबदल्यात महायुतीतल्या घटक पक्षाला जिंकणे अशक्य असलेल्या जागा सोडाव्यात किंवा त्या बदल्यात विधानसभेसाठी जास्त जागा द्याव्यात असा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु यात या विषयावर कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही. शेलार यांनीही नंतर माध्यमांशी बोलताना या चर्चेबद्दल योग्य वेळी योग्य ती माहिती दिली जाईल, असे सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content