Homeएनसर्कलभारताचा इराणबरोबर सौदा?...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, “भारताच्या सहृदय नागरिकांचे मनःपूर्वक आभार.”

या मदतीमागे केवळ मानवता नाही, तर कूटनीतीचाही धागा जोडलेला आहे. इराणने भारताशी झालेल्या राजनयिक चर्चेत हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना मुक्त मार्ग देण्याच्या बदल्यात दोन अटी मांडल्या होत्या- एक, भारताने जप्त केलेल्या इराणी जहाजांची सुटका करावी; आणि दोन, औषधे व वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करावा. या पार्श्वभूमीवर भारताने वैद्यकीय साहित्य पाठवणे, हे केवळ दयाळूपणाचे नव्हे, तर हॉर्मुझ मार्गावरील वाटाघाटींचाही एक भाग असल्याचे स्पष्ट होते. शिवालिक आणि नंदा देवी या जहाजांना हॉर्मुझमधून सुरक्षित मार्ग मिळणे आणि वैद्यकीय मदत रवाना होणे- दोन्ही घडामोडी एकाचवेळी घडल्या हा योगायोग नाही, असे जाणकार सांगतात.

इराण

इराणमधील मानवीय संकट किती तीव्र आहे, हे आकड्यांवरून स्पष्ट होते. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमुळे इराणमध्ये 32 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनी इराणमधील किमान 13 रुग्णालये आणि इतर आरोग्य केंद्रे उद्ध्वस्त झाली असून काही वैद्यकीय केंद्रांना स्थलांतर करावे लागले. जागतिक आरोग्य संस्था (WHO)चे दुबई हे जागतिक मानवतावादी पुरवठा केंद्र युद्धामुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे 25 देशांच्या 50 आपत्कालीन वैद्यकीय मागण्या रखडलेल्या आहेत आणि 1.8 कोटी डॉलर किमतीचा वैद्यकीय साठा अडकलेला आहे. अशा परिस्थितीत भारताची थेट मदत इराणसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

भारताने वैद्यकीय मदत पाठवणे म्हणजे केवळ एका देशाला मदत नाही. हे भारताच्या “शेजारी प्रथम” आणि “वसुधैव कुटुंबकम” या परराष्ट्र धोरणाचे प्रत्यक्ष दर्शन आहे. एकीकडे भारत इराणकडून तेल खरेदी करतो, हॉर्मुझमधून आपले जहाज सुरक्षित काढतो, आणि त्याचवेळी इराणच्या जखमी नागरिकांसाठी औषधे पाठवतो, हेच भारताचे संतुलित, व्यावहारिक आणि मानवतावादी परराष्ट्र धोरण जगात वेगळे उठून दिसते. अमेरिकेच्या दबावाखाली न येता, पण इस्रायलशीही उघड संघर्ष न करता भारत या युद्धात आपला स्वतंत्र मार्ग आखत आहे, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content