Homeएनसर्कलअवघ्या दोन तासांतच...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच ‘भूकंप’सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले. तर दुसरीकडे, भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९५ ही पातळी ओलांडत आजवरची सर्वात मोठी ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे.

जागतिक संकेतांमुळे बाजार दबावात उघडणार याची चिन्हे स्पष्ट होती. मात्र, ‘प्री-ओपनिंग’मध्ये त्याची झलक दिसली; पण पुढे ९.१५ वाजता बाजार उघडताच विक्रीचा प्रचंड दबाव दिसून आला. सकाळी ९.३०च्या सुमारास बाजारात ‘पॅनिक सेलिंग’ला सुरुवात झाली. निफ्टीमध्ये एकाएकी ३७० अंकांची मोठी घसरण झाली. बाजारातील या पडझडीमुळे अवघ्या दोन तासांत बीएसईवर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल लक्षणीयरीत्या घटले. सकाळी ११.१५पर्यंतच गुंतवणूकदारांचे अंदाजे ८.३७ ते ९ लाख कोटी रुपये बुडाले.

चलन बाजारातही धक्कादायक स्थिती

शेअर बाजारातील पडझडीसोबतच चलन बाजारातूनही धक्कादायक बातमी आली. भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९५.०० ची पातळी गाठली आहे. रुपयाच्या या ऐतिहासिक घसरणीमागे प्रामुख्याने खालील ५ कारणे आहेत-

१. कच्च्या तेलाचा भडका: ब्रेंट क्रूड ११५ डॉलरच्या पार गेल्याने भारताच्या आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे.

२. परकीय गुंतवणूकदारांची (एफआयआय) माघार: भारतीय बाजारातून परकीय गुंतवणूकदार वेगाने पैसा काढून घेत असल्याने रुपयावर दबाव वाढला आहे.

३. डॉलरचा वाढता दबदबा: जागतिक बाजारात डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याने रुपयासह इतर आशियाई चलनांची घसरण होत आहे.

४. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव: जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने व्यापार तूट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

५. जागतिक महागाईचा धोका: अमेरिकेतील महागाई आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे.

पुढे काय? तज्ञांचा सावधगिरीचा इशारा

बाजारातील या ‘घसरणी’नंतर तज्ञांनी गुंतवणूकदारांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. निफ्टीने २४०६०ची महत्त्वाची पातळी तोडल्याने ही घसरण आणखी खोलवर जाऊ शकते.

“बाजारातील जोखीम आता सर्वोच्च स्तरावर आहे. कच्च्या तेलाच्या किमती जोपर्यंत शांत होत नाहीत आणि रुपया स्थिर होत नाही, तोपर्यंत नवीन मोठी गुंतवणूक करणे टाळावे,” असे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. सध्याची स्थिती पाहता, सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content