Homeएनसर्कल169पैकी 154 मते मिळवत...

169पैकी 154 मते मिळवत भारताची आयएमओ परिषदेवर फेरनिवड

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) परिषदेत भारताची श्रेणी ‘ब’मध्ये फेरनिवड झाली आहे. यात, आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 देशांचा समावेश आहे. लंडनमधल्या 34व्या आयएमओ असेम्ब्लीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारताने या श्रेणीत सर्वाधिक मते मिळवली. 169 वैध मतांपैकी 154 मते मिळवण्यात भारताला यश आले.

केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हा निकाल भारताच्या वाढत्या जागतिक सागरी प्रभावाला मिळालेले मोठे समर्थन असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या इंडिया मेरीटाईम वीकच्या यशस्वी आयोजनानंतर लगेचच भारताची फेरनिवड झाली आहे. यात 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारताच्या विकसित होत असलेल्या सागरी क्षमता यात प्रदर्शित झाल्या होत्या. या कार्यक्रमाने गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा अवलंब, बंदरप्रणित विकास आणि सागरी सुरक्षा यावरील चर्चेसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. त्याचे फलित या निवडणुकीत मिळाले.

आयएमओमध्ये भारताचे महत्त्व वाढत असून सलग दुसऱ्या कार्यकाळात देशाने ब श्रेणीमध्ये सर्वाधिक मते मिळवली आहेत. अधिकाऱ्यांनी या कामगिरीचे वर्णन अमृतकाल सागरी व्हिजन 2047ला गती देण्यासाठी हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सागरी केंद्रात रूपांतरित करण्यासाठी हा दीर्घकालीन आराखडा आहे. या उपक्रमाला  मोदी स्वतः मार्गदर्शन करत असून सोनोवाल यांच्यासह बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर त्याचे नेतृत्त्व करत आहेत.

आयएमओ परिषदेत निवडून आलेले 40 सदस्यदेश आहेत जे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. असेंब्लीदरम्यान भारतीय शिष्टमंडळाने अनेक देश, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना आणि आयएमओ अधिकाऱ्यांसोबत सागरी सुरक्षा, सागरी डिजिटलायझेशन, हरित नौवहन, नाविकांचे कल्याण आणि बंदर विकासात भागिदारी वाढवण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेतल्या. भारताव्यतिरिक्त, आयएमओ असेंब्लीने ब श्रेणीमध्ये काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 सदस्य देशांना निवडले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांचा समावेश आहे.

Continue reading

डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’चे प्रकाशन

भरारी प्रकाशन, मुंबई आयोजित प्रसिद्ध कवयित्री डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या 'निळाई' या नवीन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची आणि रसिक श्रोत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती....

‘होर्मूझ’च्या अमेरिकी नाकाबंदीला चीनचे थेट आव्हान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक कोंडी करण्याकरीता होर्मूझ सामुद्रधुनीभोवती नाकाबंदी सुरू केली असतानाच चीनने अमेरिकेच्या या कृतीला थेट आव्हान दिले आहे. अमेरिकेने आमच्या जहाजांना या नाकाबंदीत अडवू नये, असे म्हणत त्यांनी त्यांचे एक तेलवाहू होर्मूझ सामुद्रधुनीतून पाठवलेही....

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेची जोरदार तयारी

राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आदी मान्यवरांनी आज सकाळी शिवाजीपार्क येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी...
Skip to content