Homeपब्लिक फिगरभारत होतोय संरक्षण...

भारत होतोय संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर…

भारताला धोरणात्मक अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार देशांतर्गत संरक्षण औद्योगिक परिसंस्थेचा मजबूत पाया विकसित करत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तेजपूर येथे 31 डिसेंबर 2023 रोजी तेजपूर विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संबोधित करत होते. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केलेल्या विविध उपायांचा उल्लेख करून राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच शस्त्रांच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितले.  आम्ही पाच सकारात्मक स्वदेशीकरण याद्या जारी केल्या, ज्या अंतर्गत 509 संरक्षण उपकरणे निश्चित केली गेली असून आता त्याचे उत्पादन स्वदेशी पद्धतीने केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण विषयक उपक्रमांच्या 4 सकारात्मक स्वदेशीकरण याद्या देखील जारी केल्या आहेत. या याद्यांमध्ये 4,666 वस्तू निश्चित करण्यात आल्या असून आता त्या आपल्या देशातच तयार केल्या जातील, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्याच्या सरकारचा सक्रिय  दृष्टिकोन विशद केला. या सक्रिय दृष्टिकोनामुळे विश्वासार्हतेबाबतच्या शंकाकुशंकांची जागा विश्वासाच्या संस्कृतीने घेतली आहे, असे ते म्हणाले. “असेच राहू द्या” हा दृष्टिकोन भारत आता सहन करणार नाही. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली, नवा भारत “चला-करूया” या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content