Homeपब्लिक फिगरगद्दारांसमोर अविश्वासाच्या ठरावाला...

गद्दारांसमोर अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जायचे नव्हते!

ज्या पक्षाने सर्व काही दिलं त्या पक्षाशी गद्दारी करून माझ्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणणाऱ्या गद्दारांसमोर मला जायचे नव्हते म्हणून नेतिकतेच्या कारणावरून आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे समाधान झाले. देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, असा प्रश्न होता. सत्तेसाठी हपापलेले लोक जे उघडेनागडे राजकारण करत होती त्याची चिरफाड सर्वोच्च न्यायालयाने केली. राज्यपालांची भूमिकाही अयोग्य होती. त्याचे वस्त्रहरण या निकालात करण्यात आले. राज्यपाल नावाची जी यंत्रणा आहे ती आतापर्यंत एक आदरयुक्त यंत्रणा होती. मात्र शासनकर्ते या यंत्रणेचे जे धिंदवडे काढतात ते लक्षात घेता ही यंत्रणा यापुढे अस्तित्त्वात ठेवावी की नाही हा विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे न्यायालयाने सोपवला आहे. मात्र त्यावेळचा पक्ष म्हणजे माझी शिवसेना यांच्या पक्षादेशाचा विचार त्यांना करावाच लागेल. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा आमचा आग्रह राहील. आता लढायला सुरुवात झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यासाठी इथे आले आहेत. आम्हाला देशाला वाचवायचे आहे. संविधानाला वाचवायचे आहे. देशाला पुन्हा गुलाम बनवणाऱ्या प्रवृत्तींना घरी पाठवायचे आहे. याकरीता सर्व पक्ष, सर्व लोकांना एकत्र करण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

नितीश कुमार यांनी याला दुजोरा देताना जास्तीतजास्त राजकीय पक्षांनी एकत्र यावे आणि त्यांची एकजूट कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे एक पाऊल म्हणूनच आम्ही येथे आलो आहोत, असे यावेळी सांगितले.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content