Homeएनसर्कलराज्यात १२ची परीक्षा...

राज्यात १२ची परीक्षा २३ तर १०वीची २९ एप्रिलपासून!

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिलपासून तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)ची लेखी परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षामंडळ संचालक दिनकर पाटील उपस्थित होते.

इयत्ता 12 वीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 एप्रिल ते  22 एप्रिल दरम्यान होईल तर लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल यादरम्यान होतील तर लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्यात इ. 9वी ते इ.12वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून 18 जानेवारी 2021पासून 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहितीही प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली.

बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहीम

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू असल्यामुळे या कालावधीत पालकांकडून मुलींचे शिक्षण थांबवून त्यांची लग्ने लावून देण्याची शक्यता जास्त आहे. अशा स्वरूपाचे बालविवाह रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जादा फी वसुलीविरूद्ध योग्य बाजू मांडू

अनेक शाळांकडून पालकांकडे जादा फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्याविरूद्ध राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. याविरूदध मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तेथे योग्य ती बाजू मांडण्यात येईल, असेही प्रा. गायकवाड म्हणाल्या.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content