Homeटॉप स्टोरीकोरोना रूग्णांसाठी आता...

कोरोना रूग्णांसाठी आता उपचारांचे घरगुती पॅकेज!

कोविडच्या (कोरोना) वाढत्या रूग्णसंख्येकडे पाहता रूग्णांवर त्यांच्या घरीच उपचार करण्यासाठी आता विविध रूग्णालयांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. सरकारी वा खाजगी रूग्णालयांमध्येही खाटा मिळत नसल्यामुळे अनेक रूग्णांची उपचारांअभावी आबाळ होते. अशावेळी ज्यांच्याकडे खर्च करण्याची ऐपत आहे, अशा रूग्णांना त्यांच्याच घरी उपचार करण्याचे पॅकेज या रूग्णालयांनी जाहीर केले आहे.

चार दिवसांपूर्वीच नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊन कोविडच्या रूग्णांवर उपचार करण्याचे पॅकेज जाहीर केले आहे. १५ दिवसांचे हे पॅकेज ३३३ रूपये प्रतिदिन, या दरापासून सुरू होत आहे. या पॅकेजमध्ये दर तिसऱ्या दिवशी डॉक्टर टेलिफोनवर रूग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेणार. दिवसातून दोन वेळा प्रशिक्षित नर्सकडून टेलिफोनवरून लक्ष देणार. नर्सकडून नियमित आढावा घेतला जाणार. रूग्णाला स्वतःची पडताळणी कशी करावी, विलगीकरणात कसे राहवे, तेथील स्वच्छता कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन करणार. घरी औषधे पाठवणार. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी घरून नमुने गोळा करणार. कोविड-१९चे वैद्यकीय किट (डिजीटल थर्मोमीटरसह) आणि रक्तदाब तपासण्याचे यंत्र देणे आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

दरम्यान, घरी येऊन कोविड चाचणीसाठी नमुने गोळा करण्याची सेवाही आता काही प्रयोगशाळांनी सुरू केली आहे. याबाबतच्या जाहिराती समाजमाध्यमांवर येऊ लागल्या आहेत.

त्यामुळे ज्यांच्याकडे खर्च करण्याची ऐपत आहे आणि ज्यांना सौम्य स्वरूपाचा कोरोना आहे त्यांनी रूग्णालयांऐवजी रूग्णालयाच्या या घरगुती सेवेचा उपयोग करून घ्यायला हरकत नसावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content