Homeकल्चर +ऐतिहासिक तोफांनी वाढविले...

ऐतिहासिक तोफांनी वाढविले मुंबईतल्या दोन उद्यानांचे सौंदर्य!

समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६७ वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पौलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी आढळून आल्या होत्या. घाटकोपर पश्चिमेला असणारे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार उद्यान आणि घाटकोपर पूर्वेला असणारे ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ या उद्यानांमध्ये या तोफा पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. उद्यानाला भेट देणाऱ्या लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या तोफा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत असून अनेक नागरिक या दोघांसह आपला ‘सेल्फी’देखील आवर्जून घेत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पालिकेचे पुरातन वास्तू जतन अभियंता खाते ज्यांच्या अखत्यारीत येते, त्या इमारत परीक्षण खात्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले की, घाटकोपर पूर्व परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी दोन जुन्या तोफा आढळून आल्या होत्या. या तोफांना एक नवी झळाळी मिळण्याच्या दृष्टीने व त्या तोफांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अनुरुपता जपत पुनर्स्थापना करण्यासाठीचा एक विशेष प्रस्ताव पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे पुरातन वास्तू ज़तन खात्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार आवश्यक तो अभ्यास करुन या दोन्ही तोफांची आता पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या तोफांना पुनर्स्थापित करताना किल्ल्यांच्या बुरुजाशी साधर्म्य साधणारे चबुतरे तयार करण्यात आले असून त्यावर या तोफा बसविण्यात आल्या आहेत.

‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा घेर हा ०.६४ मिटर आणि बाहेरील चाकांचा घेर १.१७ मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर सन‌ १८५६ या‌ वर्षाची नोंद असून एका बाजूला रोमन लिपीमध्ये ‘एन सी पी सी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. साधारणपणे १६७ वर्षे जुन्या असणार्‍या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या बुरुजासमान चबुतऱ्यावर पुनर्स्थापित केल्यामुळे आता या ऐतिहासिक ठेव्याला नवा‌ रुबाब प्राप्त होण्यासह मुंबईकरांनादेखील एक ऐतिहासिक स्पर्श असलेली विरंगुळ्याची आणखी दोन ठिकाणे उपलब्ध झाली आहेत.

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content